Saturday 13 December 2014

गोष्ट छोटी.... डोंगराएव्हडी...

गोष्ट छोटी.... डोंगराएव्हडी...
.
एकदा गाडगेबाबा नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रा जवळून चालले होते...तेव्हा नदीच्या पात्रा जवळ पत्रावळी वर भात ठेवला होता...बाबा त्या पत्रावळी वरचे खायला गेले असता...२-४ मानस धावत आले...गाडगे बाबा वर खेकसले..
"अरे मूर्ख माणसा, आम्ही पितर जेवू घालतोय... कावळा येईल आणि खाईल त्याची वाट बघतो आम्ही..."

बाबा म्हणाले, " मंग काय होईन बावजी?"

एक जण म्हणाला, "अरे तो कावळा आमच्या पितरांना स्वर्गात तो घास घेवून जाईन.."
असे म्हटल्यावर बाबा तिथून निघून गेले...
नदीच्या पात्राचे पाणी पात्रा बाहेर फेकायला लागले... तीच २-४ माणसे धावत आले, म्हणाले. "अरे मूर्ख माणसा आता हे काय करतोस?"

बाबा म्हणाले, "माय वावर उमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात शेंडगावले हाय... त्या वावरले पानी ओलोवतो..."

ती माणसे म्हणाली "अरे मूर्ख माणसा, इतक्या दूर ते पाणी जाईल कसे?"
बाबा म्हणाले, "बावाजी, तो कावळा जर तुमचा घास जर स्वर्गात नेते.. त माय पानी कावून जानार नाई माया वावरत नाही?"

एक हि वर्ग न शिकलेल्या माणसाला ही अक्कल होती...
अन आज ही शिकलेले माणस आपल्या आई-बापाला जिवंतपणी तर नाही पण ते मेल्यावर पितरं खाऊ घालतात?....
धन्य त्यांच्या पदव्या आणि धन्य ते लोक...




No comments:

Post a Comment