Friday 23 November 2012

26 नोव्हेंबर.....संविधान दिन....!









26 नोव्हेंबर.....संविधान दिन....!


                                                                           

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ ,१९५०पासून राज्यघटना अमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतीलप्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे


१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ ,१९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट १५१९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.


         ऑगस्ट २९, १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत

सध्या राज्यघटनेत ४०० कलमे असून; भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
 करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे.

चार वर्षापूर्वी 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून संविधान विरोधकांना आणि मनुवाद्याना संविधान दिवसाला विरोध करण्यासाठी एक चांगले कारण भेटले आहे. म्हणून हे नमुने काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा हा प्रत्यन लोकशाही मानणार्यांनी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी हाणून पाडायचा आहे.

देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, आपले जातीभेत, वंश भेद, धर्म बाजूला ठेवून सारे एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.

तरी सर्वाना विनंती आहे आज पासूनाच आपण संविधान दिन निमित्त माहितीपूर्ण आणि प्रबोधनपर पोस्ट टाकाव्यात, आणि आप आपल्या स्थानिक पातळ्यावर २६ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत........!

Thursday 22 November 2012

पितृ देवो भव



पितृ देवो भव

मुलांना धाक वाटणारे ‘वडील’ गायब होऊन, मुलांना मित्र वाटावा असा बाबा गेल्या दहा वर्षांत बघायला मिळत आहे. ‘अहो बाबा’ ऐवजी ‘ए बाबा’ म्हणणारी पिढीही आता मोठी होऊ लागली आहे. आई-वडील हे जवळचे मित्र-मैत्रीण वाटावे, असे दिवस आले आहेत. आई-वडिलांचे आभार मानण्यासाठी त्यांचे असे खास दिवस साजरे करण्याचं लोण आता आपल्याकडेही आलं आहे. विरोधासाठी विरोध करणारे याला फॅड म्हणतीलही, पण आपल्या आई-वडिलांचे ‘आभार’ मानायला एक दिवस मिळतो, हेदेखील आहेच ना! अशा दिवसांच्या निमित्तानं खास काही करता येतं. त्यामुळे ते दिवस, ते क्षण केवळ त्यांचे म्हणून साजरे करता येतात.
तब्बल बावन्न देशांमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. १९१० मध्ये पहिला फादर्स डे साजरा केला गेला. आपल्याकडे मात्र फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांचे आभार मानायची पद्धत सुरू होऊन एक तपही उलटलेलं नाहीये.
परवाच अनेक र्वष एकमेकांशी न बोललेले, भेटलेले मुलगी आणि वडील यांच्या हृद्य भेटीबद्दल वाचलं आणि मन भरून आलं. वीसहून अधिक र्वष मुलीचं आणि वडिलांचं काही भेटणंच झालं नव्हतं. आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर मुलगी आईकडेच राहात होती. कोणालाही न कळवता आई-मुलगी दुसरीकडे राहायला निघून गेले. वडिलांना मुलगी कुठे आहे याचा पत्ताच आईने लागू दिला नाही. दरम्यान वडील मुलीला शोधत होते. वडील आपल्याला का भेटायला येत नाहीत, याचा विचार करून मुलगी मनात कुढत होती. त्यातच तिला कॅन्सर झाल्याचं कळलं आणि ती पार कोलमडून गेली. तिची आईदेखील वारली होती. वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या मुलीने महत्प्रयासानं वडिलांना शोधून काढलं. शेवटी वडिलांचा पत्ता लागला आणि भेटल्यावर तिनं वडिलांना प्रश्न विचारला की, तुम्ही मला भेटलात का नाही? वडील म्हणाले, ‘मी तुला खूप शोधलं, पण मला तुझा काहीच पत्ता लागला नाही.’ ते वडील आता केमोथेरपीच्या वेळी तिची सोबत करतात. तिला धीर देतात. पितृछायेत तिला वेदनांचाही विसर पडला आहे. तिचा नवरा तिला, मुलं व तिच्या वडिलांना जपत आयुष्याचे गहिरे रंग अनुभवत आहे.
ही एकच नाही तर मुलं आणि वडील यांच्या अनोख्या नात्याच्या कितीतरी गोष्टी आपण आजूबाजूला पहातो. भारतात अशा ‘डेज’ची टिंगल होते याचे अजून एक कारण आहे. आशियाई देशांत विशेषत: भारतात आपण तसे कुटुंबापासून तुटलेले नसतो. लग्न झाल्यानंतर एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाण्याची वेळ (म्हणजे आई-वडिलांपासून दूर जाण्याची वेळ) फक्त मुलींवरच येते. तसेच आई-वडील सतत मुलांच्या संपर्कात असतात. सकाळी उठलं की मातृ-पितृदर्शन होतंच. मुद्दा असा की, ऊठसूट प्रेम व्यक्त करण्याची आपली पद्धत नाही. आणि मुलानं आई-वडिलांचे काय आभार मानायचे, अशीच आपली भावना असते; परंतु आपली संस्कृतीही सांगते - ‘मातृ देवो भव आणि पितृ देवो भव.’
इथे आणखी एक घटना सांगाविशी वाटते- सदतीस वर्षांचा तरुण.. खूप खूप बीझी.. पुढे जायची धडपड, त्याचा असह्य ताण.. लग्नं झालं, दोन मुली झाल्या. मग आपल्याला मिळालं नाही ते सर्व मुलींना मिळावं म्हणून अजून काम.. अजून स्पर्धा.. कोणाशी बोलणं नाही, गप्पा नाहीत. मित्र-मैत्रिणी कमी झालेले, बायकोशी मुलींचा विषय सोडून काय बोलायचं ते कळू नये इतका संवाद खुंटलेला.. एक दिवस त्याला ब्रेन हॅमरेज होऊन इमर्जन्सी रूममध्ये हलवावं लागलं. तो वाचला. त्यानं त्या दिवसाच्या आठवणी सांगताना म्हटलं- ‘डोक्यात काहीतरी खूप मोठ्ठं फुटत आहे, तसं वाटत होतं. नजरेसमोर अंधार होता; तेव्हा माझ्या मनाला करिअर, काम, पगार, पैसा यातल्या कशाचाही विचार शिवला नाही. माझ्या मुली, बायको आणि माझे हरवलेले मित्र-मैत्रिणी डोळ्यांसमोर आले. जे महत्त्वाचं नव्हतं त्या कशाचीच आठवण झाली नाही. आयुष्यभर मी जे महत्त्वाचं आहे त्यापासून पळत राहिलो. आता लक्षात येतंय की, माझ्यावर प्रेम करणारे माझ्यासोबत असणार होते. या आजारानं मला कोणचं किती आणि काय महत्त्व आहे, हे दाखवून दिलं.’ या माणसाची गोष्ट दोन महिन्यांपूर्वी मी टीव्हीवर पाहिली; परंतु आजही त्याचा प्रत्येक शब्द मला अजून जसाच्या तसा आठवतो आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते ती महत्त्वाच्या गोष्टी ठरवायची.. त्यांना त्यांचं देणं द्यायची.. ते केवळ कोणत्या तरी ओझ्यातून मुक्त व्हावं किंवा हिशेब चुकता करावा म्हणून नाही, तर नात्याचं आणि पर्यायानं आयुष्याचं आपल्यालाच ओझं होऊ नये म्हणून.. म्हणूनच फादर्स डे साजरा करावा की नाही या वादात पडण्यापेक्षा वडिलांना घेऊन एखादा सिनेमा बघणं, त्यांच्याशी एखादा खेळणं, त्यांना जेवायला घेऊन जाणं, त्यांच्या पसंतीची जुनी गाणी ऐकणं, त्यांना एखाद्या नाटकाला घेऊन जाणं, त्यांना हवं असलेलं एखादं पुस्तक देणं, त्यांच्या आवडीची गोष्ट देणं आणि आपल्याला ते अजूनही हवे आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून देणं, यात खासा आनंद आहे.
अमेरिकेमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करतात. आपल्या वडिलांचे आभार मानायला हा दिवस असतोच, पण अमेरिकेत पित्यासमान व्यक्ती, आजोबा, पणजोबा यांचीही आठवण काढली जाते. सोनोरा स्मार्ट डॉड ही महिला १९०९ मध्ये मदर्स डेच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना वडिलांसाठीही असाच सोहळा झाला पाहिजे, असं तिच्या मनानं घेतलं. तिच्या वडिलांनी विल्यम स्मार्ट यांनी पत्नीच्या निधनानंतर तिच्यासह पाच भावंडांना मोठय़ा प्रेमानं मोठं केलं होतं. सोनोराच्या या कल्पनेला अमेरिकेत सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटी १९७२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डेला सरकारी मान्यता दिली. खास वडिलांसाठी विविध भेटकरड, वस्तूंनी अमेरिकेतली बाजारपेठ सजते. आता केवळ अमेरिकेतच नव्हे, तर तब्बल बावन्न देशांमध्ये वडिलांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा हा सोहळा साजरा केला जातो.

Sunday 11 November 2012

बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये...!






  • बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये...!

    दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे आपण अनेक वर्षापासून सातत्याने ऐकत आलो आहेत.हिँदु धर्मामध्ये असे अनेक सण येत असतात.कधी कधी एकाच महिन्यात अनेक सण येत असतात.र्शावण महिना हा तर सण आणि उत्सावाचाच म्हटले तरी वाबगे ठरणार नाही.गणेशोत्सव,दहीहंडी,दसरा,नवराञ आणि दिवाळी ही त्यातल्या त्यात विशेष महत्वाची असते.यामध्ये बहुजन समाज हा मोठ्या संख्खेने गुंतलेला आणि गुरफरटलेला आहेँ.यामध्ये पुजारी आणि पुरोहित समाज र्पत्यक्ष सहभागी होत नाही. परंतु पुचा अर्चा विधीसाठी माञ आवर्जून हजर राहतील नव्हे त्यांच्याशिवाय ते कार्य होऊच शकत नाही.त्याला हिँदूचे धार्मिक ग़ंथ,स्मृती,पुराणे,रामायणे,महाभारत इत्यादी साक्ष आहे.पत्येक उपवास,सण,पूजाविधी यांचा संबंथ हिंदु धर्म आणि त्यांचे देवदेवता यांच्याशी जोडलेला आहे.त्यामुळे सर्व सामान्य माणुस हा या ना त्या कारणाने त्याचाशी जोडला गेला आहे.अलिकडे आजची तरुणपिढी हे देवधर्मापेक्षा हौसे,गवसे,नवसे यामध्ये सहभागी होऊन खाओ,पिओ,मजा करो अशा व् त्तीची झाली आहेत. आता सण उत्सव "हायटेक" झाले आहेत.त्यामध्ये धार्मिक संस्था,व्यापारी आणि पुजारी पुरोहित धार्मिकद्ष्टीपेक्षा व्यापारीद्ष्ट्या ठेवून त्याचा फायदा घेत आहेत.काही हिँदुत्ववादी धार्मिक संस्था,राजकिय संस्था,व्यक्ती यांनी हिँदु धर्माच्या र्पचार र्पसाराकरिता राञंदिवस एक केला आहे. त्यासाठी त्यांनी विशेषतः इलेर्क्टोनिक मिडीयाला हाताशी धरले आहे. त्यामध्ये काही दूरदर्शन वाहिन्या खास त्यांचाच आहेत तर काही आपली टीआरपी वाढवण्यासाठी हिँदुत्वाचा र्पचार र्पसार करीत आहेत.दुरदर्शन वाहिन्यांवर दाखविल्या जाणार्या मालिक(सर्व भाषिक मालिका) पाहील्यास हे दिसून येते की,हिँदुचे जे जे सण असतील त्याचे महत्व- पूजा त्या मालिकेतील कथानकातून दाखविली जाते. त्याचासारखा मारा केला जात आहे.त्यामुळे विशेषतः महिला वर्ग फारच र्पभावित होत आहेत. तसेच बहुजन समाज त्याच्या आहारी जात आहे.जे काम र्पबोधन होत नाही. ते काम दुरदर्शन वाहिन्यांमुळे होते.तसेच बाबा,बापु,गुरु,अम्मा,माताजी,देवर्षी इत्यादी अध्यात्मिक गुरुंनीही बहुजनांवर मोहीनी घातली आहे.बहुजनांच्या दान दक्षिणावरच हे अध्यात्मिक गुरु खास संस्थानिक झाले आहेत. त्यांनी करोडोची स्थावर आणि जंगम संपत्ती जमा केली आहे.बहुजनांबरोबरच बौद्ध समाजही त्यांच्या आराही गेला आहे.बहुजन समाज हा स्वतःला 'हिँदु'च समजतो. परंतु त्यांच्या जातीर्पमाणे त्याचा स्तर समजला जातो.बौद्ध समाज हा आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या बुद्ध धम्मामार्गाने र्कमण करित आहे.ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला तो आता "बौद्ध" झाला.बुद्ध धम्म हा हिँदु धर्माहुन सर्वस्वी वेगळा आहे.बुद्ध धम्मात देवाचे अस्तित्व नाकारले आहे तर हिँदु धर्मात तेहतीस कोटी देव आहेत.आपले इप्सित पूर्ण करण्याकरिता हिँदु धर्माच्या देवांना साकडे घालावे लागते.त्यासाठी नवस,दान,दक्षिणा,अभिषेक,पूजा या माध्यामातुन व्हाया पुजारी-पुरोहित याच्याकडुन देवाकडे जावे लागते.बुद्ध धम्म हा पटला तर स्वीकारा इतके स्वातंञ्य देतो, ज्या डॉ.बाबासाहेबांनी आपल्यासाठी जो महान धम्म दिला,त्यासाठी बावीस र्पतिज्ञाही दिल्या, त्यामाञ आपण नाकारुन पुन्हा "येरे माझ्या मागल्या" करित आहोत.म्हणुनच हिँदुचे सण-उत्सव आपले नाहितच म्हणूनच ते साजरे करु नयेत.दिवाळी ही आपली नाही हे ओघाने आलेच.दिवाळी म्हणजे आपल्या पुर्वजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्याचा हिँदूचा सण आहे.दिवाळीच्या अमावस्येला हिँदुनी ईसिगिल पर्वतावर महामोग्गलानची हत्या करण्यात आली तो दिवाळीचा दिवस होता.बौद्ध आणि बहुजनांनी त्याचा अवश्य विचार केला पाहिजे.म्हणुनच घरावर विद्युत रोषणाई,आकाश कंदील,दिवे,रांगोळी यापैकी काहीही करु नये.त्यापेक्षा आपले सण भीमजयंती,बुद्धजयंती,धम्मचर्क परिवर्तन दिन.र्पत्येक महिन्याच्या पोर्णिमा साजर्या कराव्यात.दर रविवारी बुद्ध विहारात गेलच पाहिजेँ.जे येतील त्यांच्यासह जे येणार नाहीत त्याच्याशिवाय धम्मपालन केलेच पाहिजे.आपल्या धम्म आचरणाने इतरांना र्पर्वूत्त करावे.केवळ इतरांना उपदेशाचे डोस पाजून काहीही उपयोग नाही.

Tuesday 6 November 2012

Information about MATA RAMAI BHIMRAO AMBEDKAR.



Ramabai (1896-1935) worthy daughter of Bhiku Dhutre of Wanand a village in the Dapoli sub-division. Ramabai was married to Bhimrao in 1906. Though Babasaheb married in 1906 at age of 17 his real martial life was to start now. When he again gone to England money was soon finished. Ramabai's brother Shanker and sister Gaurabai were labours. Their earning was just eight or ten 'Ana' that day. Ramabai
bought groceries from it and cooked the food. Sometimes they slept with hungry stomach. This conditions was send to Babasaheb by mail, on it Babasaheb said that " I am in same circumstances I don't have money to buy a food I don't have money to. send you. If circumstances might be hard then sell the ornaments, I will give new one when I' ll be back. In the same letter Babasaheb made an inquiry for Yashawant and Mukund. When Babasaheb came back to India some social welfare want to give some money and award But Babasaheb politely and clearly refused it.
Ambedkar did his utmost to mitigate his wife's sufferings. Medicines cures curable diseases. It could not cure here wasting disease, and the cruel bowl came to him on May 27, 1935, when the last spark of his wife's life flickered out. Ramabai was a symbol of contentment of heart, nobility of mind and purity of character. During the preceding six month she was struggling with her malady. She had grown weaker and weary ; her cheeks were sucked and colourless. Her great gift to mind alone enable her to endure with cool fortitude the hardships and sorrow that fell to her lot in those early friendless days of wants and worries. The grandeur and glory attached to Rajgriha could not distract her mind from the realities of life. She had passed the major portion of her life in pinching poverty, spent days and nights in anxiety for her husband's safety and health, observed rigid fasts, on Saturdays took only water and black gram, worshipped God, and invoked his blessings on her Saheb. Her eyes, her hands and her thoughts were devoted to the service of her Saheb. Gentle by temperament and frail by constitution, she was sober in manners, modest in speech, practical in her approach and generous in her dealings.
In her anxious moments she often blamed the conveyers of meetings and conferences that gave her husband no respite and created dangerous situations for him. She said that she could not understand why on earth so many conferences were required to teach and preach to the people. One day she had packed her luggage and insisted on her being taken to the conference at which her Saheb was to preside, so that she might not pass her days in his absence in utter restlessness. There was a little voilent quarrel, and the Saheb dissipated her fears as arrant nonsense.
Profoundly religious, she had a great longing for making a pilgrimage to Pandharpur where every year lakhs of believing Hindus bow their hands in devotion. But being an Untouchable Hindu lady, she would have been required to stand at a certain distance from the temple and offer her prayers. Self-respecting Ambedkar could not tolerate the idea and consoled her by saying : "What of that Pandharpur which prevents its devotees from seeing the image of God, by our own virtuous life selfless service and spotless sacrifice in the cause of the down trodden humanity we would create another Pandharpur."
Ambedkar had been on a week-end visit to Dr. Sadanand Galvankar at Bassein. He had returned on the previous night. Fortunately he was near her death-bed. About 10,000 people, rich and poor eminent and common, attended her funeral procession, Ambedkar walking by with a heavy heart, his eyes grave, pensive and dry with sorrow. On his return from the cremation grounds, he kept to his room, a lonely being tortured with sorrow. For a week he wept bitterly like a child, and it was difficult for his friends to console him. The Goddess of his prosperity, partner in the cause of humanity, his better-half in this earthly voyage, had departed this life. Unbeliever and destroyer of false notions of priesthood, Ambedkar in his divine love for his wife got all the funeral obsequies performed by his son in the Hindu tradition at the bidding of a Mahar priest by name Shambhoo More, who was Ambedkar's colleague since school days. some simple, believing men and women said that it was the prompting of this calamity that had made Saheb, a few days earlier, put on a hermit's dress and bid farewell to the earthly joys and happiness. He got his head tonsured. The serious face, grave and wide eyes, grim surroundings and his saintly saffron robe presented people the appearance of a hermit with a world-negating attitude