Sunday 11 November 2012

बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये...!






  • बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये...!

    दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे आपण अनेक वर्षापासून सातत्याने ऐकत आलो आहेत.हिँदु धर्मामध्ये असे अनेक सण येत असतात.कधी कधी एकाच महिन्यात अनेक सण येत असतात.र्शावण महिना हा तर सण आणि उत्सावाचाच म्हटले तरी वाबगे ठरणार नाही.गणेशोत्सव,दहीहंडी,दसरा,नवराञ आणि दिवाळी ही त्यातल्या त्यात विशेष महत्वाची असते.यामध्ये बहुजन समाज हा मोठ्या संख्खेने गुंतलेला आणि गुरफरटलेला आहेँ.यामध्ये पुजारी आणि पुरोहित समाज र्पत्यक्ष सहभागी होत नाही. परंतु पुचा अर्चा विधीसाठी माञ आवर्जून हजर राहतील नव्हे त्यांच्याशिवाय ते कार्य होऊच शकत नाही.त्याला हिँदूचे धार्मिक ग़ंथ,स्मृती,पुराणे,रामायणे,महाभारत इत्यादी साक्ष आहे.पत्येक उपवास,सण,पूजाविधी यांचा संबंथ हिंदु धर्म आणि त्यांचे देवदेवता यांच्याशी जोडलेला आहे.त्यामुळे सर्व सामान्य माणुस हा या ना त्या कारणाने त्याचाशी जोडला गेला आहे.अलिकडे आजची तरुणपिढी हे देवधर्मापेक्षा हौसे,गवसे,नवसे यामध्ये सहभागी होऊन खाओ,पिओ,मजा करो अशा व् त्तीची झाली आहेत. आता सण उत्सव "हायटेक" झाले आहेत.त्यामध्ये धार्मिक संस्था,व्यापारी आणि पुजारी पुरोहित धार्मिकद्ष्टीपेक्षा व्यापारीद्ष्ट्या ठेवून त्याचा फायदा घेत आहेत.काही हिँदुत्ववादी धार्मिक संस्था,राजकिय संस्था,व्यक्ती यांनी हिँदु धर्माच्या र्पचार र्पसाराकरिता राञंदिवस एक केला आहे. त्यासाठी त्यांनी विशेषतः इलेर्क्टोनिक मिडीयाला हाताशी धरले आहे. त्यामध्ये काही दूरदर्शन वाहिन्या खास त्यांचाच आहेत तर काही आपली टीआरपी वाढवण्यासाठी हिँदुत्वाचा र्पचार र्पसार करीत आहेत.दुरदर्शन वाहिन्यांवर दाखविल्या जाणार्या मालिक(सर्व भाषिक मालिका) पाहील्यास हे दिसून येते की,हिँदुचे जे जे सण असतील त्याचे महत्व- पूजा त्या मालिकेतील कथानकातून दाखविली जाते. त्याचासारखा मारा केला जात आहे.त्यामुळे विशेषतः महिला वर्ग फारच र्पभावित होत आहेत. तसेच बहुजन समाज त्याच्या आहारी जात आहे.जे काम र्पबोधन होत नाही. ते काम दुरदर्शन वाहिन्यांमुळे होते.तसेच बाबा,बापु,गुरु,अम्मा,माताजी,देवर्षी इत्यादी अध्यात्मिक गुरुंनीही बहुजनांवर मोहीनी घातली आहे.बहुजनांच्या दान दक्षिणावरच हे अध्यात्मिक गुरु खास संस्थानिक झाले आहेत. त्यांनी करोडोची स्थावर आणि जंगम संपत्ती जमा केली आहे.बहुजनांबरोबरच बौद्ध समाजही त्यांच्या आराही गेला आहे.बहुजन समाज हा स्वतःला 'हिँदु'च समजतो. परंतु त्यांच्या जातीर्पमाणे त्याचा स्तर समजला जातो.बौद्ध समाज हा आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या बुद्ध धम्मामार्गाने र्कमण करित आहे.ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला तो आता "बौद्ध" झाला.बुद्ध धम्म हा हिँदु धर्माहुन सर्वस्वी वेगळा आहे.बुद्ध धम्मात देवाचे अस्तित्व नाकारले आहे तर हिँदु धर्मात तेहतीस कोटी देव आहेत.आपले इप्सित पूर्ण करण्याकरिता हिँदु धर्माच्या देवांना साकडे घालावे लागते.त्यासाठी नवस,दान,दक्षिणा,अभिषेक,पूजा या माध्यामातुन व्हाया पुजारी-पुरोहित याच्याकडुन देवाकडे जावे लागते.बुद्ध धम्म हा पटला तर स्वीकारा इतके स्वातंञ्य देतो, ज्या डॉ.बाबासाहेबांनी आपल्यासाठी जो महान धम्म दिला,त्यासाठी बावीस र्पतिज्ञाही दिल्या, त्यामाञ आपण नाकारुन पुन्हा "येरे माझ्या मागल्या" करित आहोत.म्हणुनच हिँदुचे सण-उत्सव आपले नाहितच म्हणूनच ते साजरे करु नयेत.दिवाळी ही आपली नाही हे ओघाने आलेच.दिवाळी म्हणजे आपल्या पुर्वजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्याचा हिँदूचा सण आहे.दिवाळीच्या अमावस्येला हिँदुनी ईसिगिल पर्वतावर महामोग्गलानची हत्या करण्यात आली तो दिवाळीचा दिवस होता.बौद्ध आणि बहुजनांनी त्याचा अवश्य विचार केला पाहिजे.म्हणुनच घरावर विद्युत रोषणाई,आकाश कंदील,दिवे,रांगोळी यापैकी काहीही करु नये.त्यापेक्षा आपले सण भीमजयंती,बुद्धजयंती,धम्मचर्क परिवर्तन दिन.र्पत्येक महिन्याच्या पोर्णिमा साजर्या कराव्यात.दर रविवारी बुद्ध विहारात गेलच पाहिजेँ.जे येतील त्यांच्यासह जे येणार नाहीत त्याच्याशिवाय धम्मपालन केलेच पाहिजे.आपल्या धम्म आचरणाने इतरांना र्पर्वूत्त करावे.केवळ इतरांना उपदेशाचे डोस पाजून काहीही उपयोग नाही.

No comments:

Post a Comment