Sunday 27 October 2013

"इडा -पिडा टळो आणि पुन्हा बळीचे राज्य येवो."











"दिवाळी"

"बळी राजाचा दिला बळी ,ब्राह्मण खाती पोळी !!!!"

"ऐका कथा दिवाळी सणाची", 

        प्राचीन काळी नरकासुर नावाचा एक राक्षस म्हणजे मोठा पराक्रमी,अनार्यांचा नेता होता. त्याने तपश्चर्या करून देवाकडून वरदान मिळवले होते. देवांनी त्याला 'वैषनालास' हे शक्तिशाली अस्त्र दिले होते. तेव्हा तो नरकासुर राक्षस देवांना हि त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचा ऐरावत (हत्ती) व घोडा पळवून नेला . सर्व देवन पकडून तुरुंगात टाकले. अनेक स्त्रियांना बंदिवान केले. त्यांच्यावर अत्याचार केले . त्याच्या जुलुमामुळे हैराण झालेल्या भूदेवांनी म्हणजे आर्य ब्राह्मणांनी भगवान श्रीकृष्णाकडे तक्रार केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्या नरकासुरा सोबत युद्ध करून त्याला ठार मारले आणि तुरुंगात बंदी करून ठेवलेल्या राजांना व स्त्रियांना सोडविले. नरकासुराला ठार मारल्यानंतर स्त्रियांनी आरत्या ओवाळून श्रीकृष्णाचे स्वागत केले,तर लोकांनी आपापल्या घरीदारी पणतीचे दिवे पेटवून आणि फटके लावून सर्वत्र जल्लोष केला . प्रत्येक घरी पुरणपोळीचे गोड जेवण केले व तो दिवस आनंदोस्तव म्हणून साजरा केला. तो नरक चतुर्थीचा दिवस होता. त्या दिवशी सर्व लोकांनी दिवाळीचा सण साजरा केला. आपल्यावरील नरकासुराचे संकट दूर झाले म्हणून लोक दिवाळीचा सन साजरा करतात.   

               दिवाळीच्या सणाबद्दल ची दुसरी एक कथा हिंदू शास्त्र पुराणात आहे. ती कथा अशी आहे प्रल्हाद या'अनार्य राजाचा नातू बळीराजा प्रल्हादाच्या नंतर राजा झाला. बळीराजा मोठा पराक्रमी,कर्तबगार ,कर्तव्यनिष्ठ,न्यायी ,दयाळू प्रजाहितदक्ष व दानशूर होता. त्यांनी आपल्या राज्यात सुखसमृद्धी निर्माण केली होती . त्यांनी प्रजेच्या हिताची व कल्याणाची चांगली कामे केली होती. त्यामुळे बळीराजाच्या राज्यातील सर्व प्रजा सुखी व समाधानी होती . त्यामुळे सर्व प्रजा बळीराजाला देवासमान मानीत होती. त्याच्याकडे कोणी गरजू माणूस किंवा भिक्षुक गेला तर,तर त्यांना बळीराजा मदत करीत. पण त्याचे विरोधक आर्य व ब्राह्मण त्याचा द्वेष करीत होती . कारण बळीराजा आर्यांचा वैदिक धर्म,ब्राह्मणांचे वर्णवर्चस्व आणि त्यांच्या देवन मनी नव्हता. त्यांना विरोध करीत होता. बळीराजाने आपल्या  पराक्रमाच्या जोरावर कारस्थानी आर्य ब्राह्मणांचा पूर्ण बंदोबस्त केला होता. तो मोठा बळी होता. त्यावरून "बळी तो कानपिळी" अशी म्हण पडलेली आहे. अशा त्या महाबळी  बळीराजाचा कट काढण्यासाठी कारस्थानी आर्यांनी एक कपट कारस्थान रचले. आर्यांचा प्रमुख वामन याने ती कामगिरी पार पडली. 

                 वामन हा धूर्त व कपटी होता. त्याने भिक्षुकाचे सोंग घेतले आणि तो बळीराजाकडे गेला व म्हणाला,"हे राजा,तू मोठा पराक्रमी,दयाळू आणि दानशूर आहेस. तेव्हा मला फक्त तीन पावले जमीन दान  दे. मी एक याचक तुझ्या दारी भिकेसाठी आलो आहे. "तेव्हा त्या भोळ्या बळीराजाने कसलाही विचार न करता त्या कपटी वामनाला तीन पावले जमीन दान दिली.तेव्हा त्या कपटी व विश्वासघातकी वामनाने (विष्णूच्या अवताराने) म्हणे आपले विराट रूप प्रगट केले व पहिले पाऊल उचलून सर्व आकाश व्यापले ,दुसरे पाऊल टाकून सारी पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेविला त्याला जागा शिल्लक नव्हती. म्हणून त्याने बळीराजाला विचारले,"हे राजा,आता मी तिसरे पाऊल कोठे ठेवु ?"तेव्हा बळीराजा म्हणाला,"ठेव माझ्या डोक्यावर," त्यावेळी कपटी व दुष्ट वामनाने तिसरे पाऊल उचलून बळीराजाच्या डोईवर ठेवले आणि त्याला पाताळात गाडले व बळीराजाचा शेवट केला. खरे तर कपटी वामनाने विश्वासघाताने ठार मारले. परंतु त्यासंबंधी धूर्त ब्राह्मणांनी त्या घटनेचा संबंध विष्णूच्या अवताराशी जोडून आणि एक कपोलकल्पित कथा निर्माण केली व तिला सणाचे स्वरूप दिले आहे. हि खरी वस्तुस्थिती आहे.  हि कथा खोटी आहे.  

     "बळीराजा दुष्ट ,दुर्जन ,दुचारी व अन्यायी होता. त्याने प्रजेवर अनेक अन्याय -अत्याचार केले. म्हणून भगवान विष्णूने वामनाचा अवतार घेऊन त्या दुष्ट राक्षस बळीराजाला पाताळात गाडले आणि प्रजेला बळीराजाच्या जाच्यातून मुक्त केले. त्यावेळी सर्व प्रजेने आपल्या घरीदारी आकाशदीप लावले. पणत्या पेटवल्या,पणत्यांची आणि रांगोळ्यांची  आरास केली. फाटके वाजविले व सर्वांनी आनंदोस्तव साजरा केला. बळीराजाला वामनाने'पाताळात गाडल्यानंतर सर्व प्रजेने पुरणपोळीचे व गोड जेवण केले आणि आपला आनंद व्यक्त केला. त्या दिवसापासून दिवाळीचा सण साजरा केला जातो. अशी पुराणकथा हिंदुशास्त्र,भागवत पुराणात आहे. परंतु त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. कारण बळीराजा जर दुष्ट असता ,अन्यायी होता,प्रजेला त्रास देत होता तर आज सुद्धा खेड्यातील स्त्रिया दिवाळी पाडव्याला पुरुषांना ओवाळताना म्हणतात. "इडा -पिडा ळो आणि पुन्हा बळीचे राज्य येवो. "  'इडा -पिडा म्हणजे ब्राह्मणांकडून बहुजन समाजाला होणारा त्रास टळो,असा त्या म्हणण्या मागील अर्थ आहे. मग बळीराजा दुष्ट व अन्यायी कसा ? वाईट कसा? खरेतर बळीराजा प्रजाहितदक्ष,दयाळू,कर्तव्यदक्ष व आदर्श राजा होता. पण आपला शत्रू म्हणून कावेबाज ब्राह्मणांनी कपटकारस्थान करून बळीराजाचा खून केला आणि त्या सत्य इतिहासचा विपर्यास केला आहे. तो सत्य इतिहास व ब्राह्मणांचे कारस्थान ब्राह्मणेत्तर बहुजन समाजाने समजून घेतले पाहिजे. दिवाळी हा सण आर्य ब्राह्मनांच्या विजयाचा आणि आनंदाचा ,तर ब्राह्मणेत्तर बहिजन समाजाच्या पराभवाचा ,दुःखाचा व सुतकाचा आहे. मग दिवाळी चा  सण आमचा आनंदाचा म्हणून दरवर्षी साजरा करायचा का? हा प्रश्न आहे. 

"दिवाळीचा सण श्रीमंताचा आहे. गरीबांचा नव्हे!!!!" 

"श्रीमंतांची रोजच असते दिवाळी,गरिबांच्या जीवनांची होत असते होळी!!!"

   या देशात ३० कोटी गरीब जनता दारिद्रयरेषेखाली हलाखीचे जीवन जगते आहे. "ठेविले अनंते तैसेचि राहावे,चित्ति असून द्यावे समाधान ," या समजुतीने बहुजन समज आपले कष्टमय जीवन जगात असतो. परंतु आपल्यावर हि पाळी का आली ? याचा बहुजन'समाज करीत नाही. हे त्याचे दुर्दैव आहे. हे सारे भोग आपल्या सणामागे आहे. निदान आता तरी बहुजन समाजाने जागे व शहाणे व्हावे आणि आपण साजरे करीत असलेल्या सणामागचा खरा व खोटा इतिहास समजून घ्यावा.





Thursday 17 October 2013

!!!!! अश्विन पोर्णिमा !!!!

                                                                                                !!!!! अश्विन  पोर्णिमा  !!!!

                                                                  आज "अश्विन  पोर्णिमा" या पौर्णिमेचे महत्व जाणून घेऊया 





!!!!! अश्विन  पोर्णिमा  !!!!

बौद्ध धम्मात अस्सायुजो अथवा आश्विन पोर्णिमादि हे सुद्धा वर्षावासाच्या कालावधीतच येते ती वर्षावासातील अंतिम पोर्णिमा म्हणजेच आश्विन पोर्णिमा. आश्विन पोर्णिमा बौद्धजगतामध्ये मोठ्या श्रद्धेने स्मरण केली जाते ती सम्राट अशोकामुळे. या पौर्णिमेला वर्षावासाची सांगता केली जाते. म्हणून या पौर्णिमेचा जास्त महत्व आहे. सम्राट अशोक हा मौर्य वंशाचा संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू. सम्राट अशोक साऱ्या विश्वात प्रजेवर जीवापाड प्रेम करणारा,वन्यपशुंवरही करुणा दाखवणारा,अहिंसेचे तंतोतंत पालन करणारा,लोक कल्याण आपले आद्य कर्तव्य मानणारा ,प्रियदर्शी राजा म्हणून ओळखला जातो. 

बौद्ध ग्रंथानुसार अशोकाच्या आई चे नाव  शुभदांगीस  होते आणि वडिलांचे नाव बिंदुसार. महाराजा बिंदुसार याने राणी  शुभदांगीस पट्टराणीचा दर्जा दिलेला होता. राणी  शुभदांगी चंपा (भोगलपूर )ची ती ब्राह्मण कन्या होती. नावाप्रमाणे ती अतिशय सुंदर होती. इ.स.पु ३ ० ४ मध्ये  तिच्या पोटी अशोकाचा जन्म झाला. पुत्र प्राप्ती झाल्यानंतर महाराजा बिंदूसारांनी असे म्हटले ,'मी आता शोकरहित झालो' म्हणून त्यांनी आपल्या पुत्राचे नाव अशोक ठेवले. सम्राट अशोकस एकूण पाच राण्या होत्या १. देवी  २.असंधिमित्र  ३ .कालुवाकी   ४.पद्मावती   ५ . तिष्यराक्षिता. राणी "देवी" शी सम्राट अशोकाचा विवाह  इ.स.पु २८६ मध्ये संपन्न झाला. तिच्या पोटी महेंद्र नावाचा पुत्र आणि संघमित्रा नावाची कन्या जन्मास आली. त्यांचा जन्म अनुक्रमे इ.स .पु २८४  व  इ.स .पु  २८२  मध्ये झाला. 

 राज्याभिषेकाच्या  आठव्या वर्षी सम्राट अशोकाने कलिंग ची लढाई जिंकली.  अशोकाच्या जीवनात कलिंगच्या युद्धाने मोठी 'क्रांती घडवून आणली. ते एक अतिशय भयंकर युद्ध होते. त्यात सुमारे एक लक्ष्य सैनिक मारले गेले.दिड  लक्ष सैनिक जायबंदी झाले. तीन लक्ष सैनिकांना बंदी बनविण्यात आले. कलिंगचे युद्ध अशोकाच्या जीवनातील शेवटचे युद्ध होते. या ज्वालामुखी युद्धाने जो विनाश झाला ,त्याचा अशोकाच्या मनावर फार गंभीर प्रभाव पडला. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या विधवांच्या रडण्याने ,बालकांच्या आक्रोशाने त्याला खूप पश्चाताप झाला. त्याचा त्याच्या जीवनावर युगांतकारी प्रभाव पडला. 

अशा या शोकाकुल मनाच्या अवस्थेत त्याच शांतीची गरज होती. नेमक्या त्याच वेळी भिक्खू मोग्गलिपुत्त तिस्स या भिक्खूंची भेट झाली. त्यांच्या 'अप्पमाद-वग्ग (अप्रमादवर्ग) या उपदेशाने त्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. भन्ते  मोग्गलिपुत्त तिस्स यांस सम्राट अशोकाने  आपला धम्म गुरु मानले. अशोकाने भन्ते  मोग्गलिपुत्त तिस्स कडून बौद्धधम्माची दीक्षा घेतली. त्यांनी महाराजा अशोकास धम्मपदातील उपदेश पुढीलप्रमाणे दिला -

               अप्पमादो अमतपदं पामादो मच्चुनो पदं । 
               अप्पमत्ता न नियन्ति ये परमत्ता यथा मता ॥   

अर्थ -प्रमाद  न करणारा अमृत पदाचा साधक बनतो आणि प्रमाद करणारा मृत्यूपदाचा. अप्रमादी माणसे मारत नाहीत,परंतु प्रमादी मनुष्य नेहमी मृत्यू समान असतो. 

तर ज्या दिवशी भिक्खू मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या संपर्कात येउन सम्राट अशोक ने त्यांच्या कडून दीक्षा घेतली.बौद्ध उपासक बनला .तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी ,इ . स . पु. २ ६ ६ चा यासच अशोक विजया दशमी म्हणतात. सम्राट अशोकाच्या धम्मादिक्षेनंतर त्याच्या राज्यातील तमाम सर्वसामान्य जनताही धम्माकडे वळली. 

भगवंतांच्या महापारीनिर्वानानंतर त्यांच्या अवशेषांची आठ भागामध्ये विभागणी करून आपापल्या राज्यांत स्तूप वा चैत्य बनविण्यात येउन त्यात अस्थि -वशेष ठेवण्यात आले. ती पुण्ये स्थाने पुढीलप्रमाणे -
१ . अजातशत्रू -राजगृह
२ . शाक्य -कपिलवस्तू 
३ . बुली -अलकप्प 
४ . कोलिय -रामग्राम 
५ . मल्ल -पावा 
६ . लिच्छवी -वैशाली 
७ . ब्राह्मण -वेठद्वीप
८ . मल्ल -कुशीनगर . 

या सर्व ठिकाणांवरून धातू काढून त्यांची अनेक संख्येत विभागणी करून अशोकांनी त्या अवशेषांवर विविध ठिकाणी ८४००० हजार स्तूप बनविले.

Thursday 10 October 2013

१४ ऑक्टोबर १९५६ धम्मदिक्षा





१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरला धम्म दीक्षेसाठी केव्हा येणार आहेत याची कल्पना कोणालाही न्हवती, या संदर्भात बाबासाहेबांनी अत्यंत गुप्तता पाळली, शे.का.फे.च्या नेत्यातील राजकारणाचा उताविळपणा आणि बुद्ध धम्माविषयी अज्ञानता लक्षात घेवूनच बाबासाहेबांनी सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी नागपूरचे वामनराव गोडबोले यांना सोपवली. दि ११ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० वाजता बाबासाहेब विमानाने नागपूरला आले, गोडबोले, सदानंद फुलझेले, आकांत माटे, रेवाराम कवाडे बाबासाहेबांना घ्यायला गेले होते.

दि.१२ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी घोषित केले कि, बौद्धधर्माची दीक्षा घेणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांनी पांढरी वस्त्रेच परिधान करावी, २१ वर्ष वरील तरुणांना व इतरांना १ रुपया रीतसर पावती घेवून नावाची नोंद करावी लागेल. दि.१२ ऑक्टोबर १९५६ सायंकाळी ६ वाजता हॉटेल शाम मध्ये कार्यकर्ते जमा झाले, चर्चा सुरु झाली, "एका कार्यकर्त्याने विचारले,"बाबासाहेब आम्ही आपणाबरोबर जर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर मग निवडणुकीसाठी रिझर्व सीट वर आम्हाला कसे उभे राहता येईल ?
बाबासाहेबांनी त्या कार्यकर्त्याकडे कटाक्ष टाकला, आणि काहीश्या संतापाच्या आविर्भावाने ते म्हणाले,
"ज्यांना रिझर्वेशन बाबत काळजी वाटते त्यांनी खुशाल जावे, ज्यांना माझ्याबरोबर बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, त्यांनी माझेबरोबर राहावे...! (मी पाहिलेले बोधिसत्व - बिक्षु सुमेध - पृष्ठ ८४ )


Dr. Babasaheb Ambedkar At Milind College, Aurangabad

Jay Bhim 

Monday 30 September 2013

Vipassana pioneer SN Goenka is dead





 Vipassana pioneer SN Goenka is dead

Spiritualist and pioneer of the Vipassana meditation in India, SN Goenka, 90, died late Sunday night at his residence in Mumbai due to old age, an aide said here on Monday. 

He is survived by his wife Mata Elaichidevi and six sons. 

The funeral would be held on Tuesday in Jogeshwari electric crematorium, said aide Gautam Gaikwad. 

Goenka started teaching Vipassana meditation in 1969 and followed it up with a meditation centre in Igatpuri, near Nashik, in 1976. 

Last year, Goenka was conferred the Padma Bhushan, India's third highest civilian award. 

Born and raised in Burma, Goenka was a successful businessman when he came in contact with the late Sayagyi U Ba Khin, who taught him the Vipassana techniques. 



After 14 years training under Sayagyi, Goenka decided to settle in India and started teaching Vipassana meditation in 1969. 

He established the Vipassana International Academy, a meditation centre in Igatpuri in 1976. 

Later, 172 more such centres blossomed worldwide, including 75 in India. 

In 1982, he became a vipassanacharya and started training teachers worldwide and established the Vipassana Research Institute in Igatpuri in 1985. 

Goenka's technique represented a tradition that can be traced back to Lord Gautam Buddha who taught 'Dhamma' as the non-sectarian way to liberation. 

Goenka's approach was also totally non-sectarian and found universal appeal, including among jail inmates in India and US. 

In 2000, Goenka addressed the Millennium World Peace Summit at the UN headquarters in New York. 

Following his passion, he laid the foundation of the Global Vipassana Pagoda at Gorai Beach, in north-west Mumbai. 

Standing at 325 feet (or the height of a 30-storeyed building), it encompasses the world's largest pillar-less stone dome, twice as big as the Basilica of St Peter at the Vatican City. 

In the centre is a circular meditation hall, 280 feet in diameter with a seating capacity of 8,000, and relics of Buddha are kept in the pagoda. 

Goenka believed that the monument would bridge different communities, sects, races and countries to make the world a more harmonious and peaceful place.