Sunday 16 December 2012

Save Girls Child


निसर्गाने मानवाची निर्मिती करतांना स्त्री आणि पुरूष निर्माण केले आणि गेल्या दोन ते तीन दशकांपर्यंत त्यांच्यातील गुणोत्तरही समान ठेवले. निसर्ग सर्वांचा समतोल साधू शकतो परंतु आपल्या स्वार्थासाठी आपण त्यामध्ये ढवळाढवळ सुरू केली. मुलगाच हवा ह्य
ा मोहापायी आपण मुली नाहीशा करू लागलो. ह्यालाच प्रचलित शब्द स्त्रीभ्रूणहत्या असा आहे.
बाळंतपण ही स्त्रीच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना पूर्वी तर पुर्नजन्मच मानला जायचा. विज्ञानात प्रगती झाली आणि नवीन उपचार, साधने, औषधे निघाली. बाळंतपण त्यामानाने सोपे झाले. बाळाची स्थिती कशी आहे ते समजू लागले. परंतु त्याचवेळी बाळाचे लिंग त्या तपासणीमध्ये कळू लागले आणि एक नवीनच उपक्रम सुरू झाला.
बाळाची स्थिती समजण्यासाठी वापरण्यात येणारी सोनोग्राफीची यंत्रे प्रथम शहरांमध्ये उपलब्ध झाली. तपासणीची फी पण मोठी असल्याने शहरी आणि बर्‍यापैकी सांपत्तीक स्थिती असणारे सुशिक्षित लोक या यंत्रांचा बाळाच्या आरोग्याबरोबरच त्याची लिंग तपासणीसाठी वापर करू लागले. मुलीचा जन्म नकोच अशी बर्‍याच पालकांची इच्छा असल्याने जन्माला येणा-या बाळाचे लिंग जाणून घेऊन आपल्याला हवे असलेले मूल जन्माला घालण्याची वृत्ती वाढली.
ह्या सार्‍याचे कारण एकच की आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये मुलाच्या जन्माला फार महत्व दिले आहे. मुलगा वंश पुढे चालवितो, मुलगा म्हातारपणी आपली काठी बनून रहातो. मुलगा आधार आहे आणि मृत्यूनंतर मुलाने अत्यंसंस्कार केल्यास मोक्ष मिळतो. (इ. गोष्टी लोकांच्या मनावर ठसल्या आहेत) तर मुलीला हुंडा द्यावा लागतो, सासरी गेल्यावर मुलीचा छळ होतो, अनेक संकटांना तिला सामोरे जावे लागते, अगोदर शिक्षणावर व नंतर लग्नावर खर्च करावा लागतो आणि शेवटी ती दुसर्‍याच्या घरीच जाणार आहे मग तिच्या शिक्षणावर खर्च का करावा इ. गोष्टी लोकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
त्यानंतर मुलामुलीतला भेद, मुलगीच नको, तिला नाहीसे करण्याच्या अनेक पध्दती पाठोपाठ आल्याच. ह्या सर्व गोष्टींवर उपाय शोधणे आवश्यक आहे. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या हजारात जवळपास १३० ने कमी झाली आहे. येत्या जनगणनेत ती अजूनही कमी होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरातचा काही भाग यामध्ये निघृणपणे मुली मारल्या जात आहेत. पैसे देऊन मुली दुसर्‍या राज्यातून आणून मुलांची लग्ने लावून दिली जात आहे. मुलींवरील अत्याचाराच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वात सुरक्षित महाराष्ट्रातही कोणत्याही वयाच्या असोत स्त्रिया असुरक्षित आहेत.
प्रथमत: मुलगा आणि मुलगी हा सामाजिक भेद दूर व्हायला हवा. संधी मिळाल्यास मुली मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत किंवा काकंणभर पुढेच आहे हे मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाने सिध्द केले आहे. मुलगी असो अथवा मुलगा त्या अपत्याला त्याच्या कुवतीनुसार शिक्षण मार्गदर्शन देऊन स्वत:च्या पायावर उभे करणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. मुलाच्या लग्नात मुलीच्या पालकांकडून हुंडा, भेट वस्तू इ. घेणे ह्या प्रथा मुलाच्या पालकांनी मोडायला सुरवात करायला हवी. येणारी मुलगी ही आपली जबाबदारी असून घरातील एक व्यक्ति म्हणून सर्व हक्क व अधिकार तिला देणे आवश्यक आहे. संपत्तीत मुलीचा वाटाही समान असावा ह्या सर्व बाबी कायद्याने संमत असल्या तरी त्यांची सामाजिक अंमलबजावणी सर्व स्तरावर त्वरित सुरू व्हावी. यासाठी समाजसेवकांनी, समुपदेशकांनी प्रयत्न करावेत. नववी, दहावीच्या वर्गांपासून ह्या सामाजिक विषयाचे मुलगा मुलगी समान, दोघांचे हक्क व त्यांची कर्तव्ये सारखी आहेत, हुंडा घेणे चुक आहे, ह्या बाबींचे प्रशिक्षण त्यांना देऊन त्या त्यांच्या मनावर ठसतील असे शिक्षण संस्थांनी बघावे.
आम्हाला पहिली मुलगी आहे तेव्हा दुसरा मुलगाच हवा किंवा पहिले अपत्य मुलगाच हवे व लिंगनिदान करून आम्ही लोकसंख्या न वाढायला मदत करीत आहोत असा काही जणांचा दावा आहे. त्यासाठी पुढे गेलेल्या विज्ञानाच्या मदतीने गर्भधारणेपूर्वीच हव्या त्या लिंगाच्या रंगसूत्रांची स्थापना केली जाते. परंतु ह्या सर्व घटना निसर्ग नियमांच्या विरूध्द आहेत, हे कोणी लक्षात घेत नाही. जेव्हा मुलींची समाजातील प्रतिष्ठा व महत्व वाढेल तेव्हाच मुलगाच हवा ही वृत्ती बंद होईल. मुलींची संख्या कमी झाली की त्यांचे महत्व वाढेल ही अगदीच चूकीची समजूत आहे.

याबाबत सर्व स्तरावर प्रयत्न करतांना सुजाण नागरिकांनी, मंडळांनी कमिट्या तयार कराव्यात. मुलगी गर्भाचा गर्भपात करणार्‍या संस्थांचे, डॉक्टरांचे गुन्हे उघडकीला आणावेत. कायदा समजून घेऊन कायद्यातील तरतूदींची माहिती करून घ्यावी. त्याबाबतची जाणिव, जागृती निर्माण करावी. सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत कोणीहि असोत त्यांना मुलींच्या घटणार्‍या संख्येंचे दुष्परिणाम समजावून सांगायला हवेत. एखादे मिशन हातात घेतल्यासारखा सतत हा विषय चर्चेत यायला हवा. चांगल्या पध्दतीने समजावल्यास मुलामुलीतली तफावत कमी व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी अभ्यास करून त्यावर यशस्वीपणे बदल घडविला आहे. उर्वरित ठिकाणी असेच प्रयत्न व्हायला हवेत यासाठी समविचारी लोकांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.


Saturday 1 December 2012

The Battle Of Bhima Koregaon....1st January 1818...!



The Battle Of Bhima Koregaon....1st January 1818...!

History of India is nothing but the fight/struggle between untouchables and so called upper castes. Historians those are ought to be rationalist, have always misled masses and never showed the true face of Indian History. Hence, this battle has also been lost into history and no reference is found in any history book.

January 1st 1818, when ev

eryone around the world was busy in celebrating the ‘new year’, when everyone was in cheerful mood, but not for a small force of 500 untouchable soldiers were preparing them to for battleground. Who knows this battle is going to write future of ‘Brahmin Peshwa Baji Rao-II’? It wasn’t just another battle; it was a battle for self respect, esteem and against the supremacy of Manusmriti. This battle is important in history, as everyone know that after this battle rule of ‘Peshwa Rao’ ended.

In the early 19th century, the Maratha Empire led by Peshwa Baji Rao II was gradually diminishing due to internal dissents and setbacks in the previous Anglo-Maratha wars. Maharashtrian society under Peshwas had followed nastiest kind of social discrimination wherein the lower strata of society such as untouchables were confined to the stringent Brahmanical laws and subsequently their mobility and development were impaired. The untouchables had suffered the most in the 2000 year old caste system. But regimes such as of the Brahmincal Peshwas are the best examples where untouchables and the lower caste groups experienced horrendous and nastiest form of social humiliations to carry broom sticks on their backs and earthen pots hung on their necks wherein they released their spit.

This battle took place on January 1st, 1818, near the banks of Bhima River in Koregaon (north-west of Pune) between small forces of ‘500 untouchables’ (Mahars) soldiers of 2nd Battalion, 1st regiment of ‘Bombay Native Light Infantry’ and Peshwa soldiers. ‘Bombay Native Light Infantry’ was headed by ‘Caption Francis Staunton’. Compared to the ‘500 untouchables soldiers’ Brahmin Peshwa Rao’s force was large in numbers, they were more than 20,000 horsemen and 8,000 infantry soldiers. After walking down more than 27Miles distance from Shirur to Bhima Koregaon without rest or reprieve, without food or water ‘500 untouchables’ fought so bravely for 12 hours and won the battle. Battle ended not only with ‘victory’ over Peshwa but it become responsible for the end of ‘Peshwai’ in Maharashtra.

This battle had unusual significance for many reasons. First, British army fought this battle with a minuscule army expecting the worst, especially after their experience of the Pune Regency. Secondly, the battle of Koregaon was one of the most important events which helped tear down the Peshwa Empire and subsequently the Peshwa had to abdicate. Thirdly and most importantly, it was an attempt by the untouchables of Maharashtra to break the shackles of the age-old caste order.

The Peshwa's troops inexplicably withdrew that evening, despite their overwhelming numbers, giving the British an important victory. The men of the 2/1st Regiment Bombay Native Infantry, who fought in this battle, were honored for their bravery. The official report to the British Residents at Poona recalls the "heroic valour and enduring fortitude" of the soldiers, the "disciplined intrepidity" and "devoted courage and admirable consistency" of their actions.

Much praise was showered on the Mahar Sepoys of the Bombay Army who endured the rigours of difficult marches when rations were low and disease was high among men and animals. Whether they were charging ahead or were besieged or taken prisoner-of-war, whether they were storming fortresses or making tactical withdrawals, they always stood steadfast by their officers and comrades, never letting down the honour of their Regiments. Similar anecdotes are recorded in the written histories of the Mahar Regiment and Bombay Army. All demonstrate that most Mahars soldiers were dedicated and courageous.

This Battle was commemorated by an obelisk, known as the Koregaon Pillar (Vijay Stambh), which featured on the ‘Mahar Regiment’ crest until Indian Independence. The ‘Vijay Stambh’ reminds us ‘together we can achieve anything’. The monument has names inscribed of twenty two untouchables (Mahars) killed there, erected at the site of the battle and by a medal issued in 1851. Today, the monument still "serves as focal point of Untouchable (Mahar) heroism". Dr. Babasaheb Ambedkar used to visit Bhima Koregaon (Shaurya Bhomi) every year on 1st January to pay homage to great Mahar soldiers of The Bhima Koregaon Battle.

On New Year eve, rather than visiting pubs, dancing and enjoying over beer bottles, pay rich tribute to the heroes of ‘Battle’. This all will show respect, our commitment, courage and awareness towards our rich history. One step ahead we can suggest or request all of you that in remembrance of untouchable soldier who fought and died for self respect and esteem in ‘Bhima Koregaon Battle’ over the haughty, superior and arrogant ‘Savarnas’.

Lord Buddha T.V


On November 26, 2010, Sachin, who resides in the city’s Imambada slums in Rambagh area, started a big journey by launching India’s first religious channel on Buddhism – Lord Buddha TV.

He had a team of six, which included only one cameraman, all of whom were from the same slum. In a short span, the channel which started as a local one for cable TV viewers, has crossed over to nine states to become a national channel with round-the-clock broadcasting.


The channel has spread its wings and has even opened offices in all major cities of Maharashtra and other metros in the country. When it started from a rented premises at Prathemesh Vihar on Great Nag Road, nobody from the team, mostly youngsters from the slums who had failed to clear the Std X examination, dreamt that their project would reach dizzy heights. But their hand work and instinct to do something different, with an objective to serve the society in general, paid off. Within a span of six months, the channel had become a hit on local cable TV.

“Believe it or not, but we began our first shoot with a camera used for covering marriages. All of us hail from the slums and came together for a noble cause,” says Sachin, adding that their journey has been an extremely tough one so far. He fled from home at the age of 20 after being scolded by parents for not doing well in studies.

Sachin quit studies after clearing the class XII exam to join a cable channel and after some training, took up the job of a cameraman at a meagre salary of Rs1,500 in 2000. He always dreamt of being an entrepreneur and soon left the cable TV job to start his own news on cable channels titled ‘Nagpur Varta’ as a freelancer. The idea for a channel on Buddhism came to his mind when he was working as a cameraman and covered Deekshabhoomi celebrations during Dussehra. He also came in contact with social worker Bhaiyyaji Kherkar. They were joined by his childhood friend-cum-brother Raju Moon, who was a cable operator, to start the concept of launching a religious channel.

“After some deliberations, we decided to start the first-of-its-kind channel which will propagate philosophies and thoughts of Lord Buddha and also of Dr Babasaheb Ambedkar, who are our sole inspiration. At that time we had no money to pay rent for the flat from where we started,” says Sachin.

Deliberating on the contents, Kherkar informs that their channel not only focuses on religious discourses but also on social and national issues related to the society. “We mainly focus on outdoor shoots. Since a year, we have started accepting advertisements. But their contents are strictly restricted. We don’t accept glamorous ads or those which are not suitable for family viewing,” he states.
He further informs that they were also running shows related to families and their unique one was related to marriage where the channel acts like a bureau.

Sachin adds that he and other members are currently funding the channel from their own pockets and also receiving help from like-minded people. “We do a lot of charity works as well. Those who donate money to us, we provide them birthday advertisement for just Rs1,000 whereas its rates are over Rs10,000 on other channels,” he says.

Sachin now plans to set up their own teleport in the city. It will be based at Asola, near Butibori, 30 kms from Nagpur. A teleport is the facility which uplinks the channel with satellites in earth’s orbit so that it could be broadcast to other countries or continents. So far, it is only available in Delhi and a couple of metro cities like Mumbai and Chennai. “It will be the second in the state after Mumbai and first in Vidarbha, and will commence working within six months. We’re working overtime to make it a reality,” says Sachin.

“Currently, we are using an innovative technology to broadcast channel contents directly from the city. We have tied up with Reliance for using their high speed fibre-optic connectivity to transfer the contents to Delhi. We have a tie up with a news channel based in the Noida Film City for up-linking the contents to INSAT-4A from where the channel is broadcast to the entire country,” he adds.

Among other plans, Sachin says they’re converting the channel into full High-Definition (HD) by April and for this they had started purchasing HD cameras and accessories. “We’re also in talks with two direct-to-home (DTH) networks for broadcasting our channel to villages as cable is not available in many rural areas,” he says. Currently, the channel is in Marathi but from October 24 – Dussehra Day – it will be completely telecast in Hindi for national viewers. From 2014, the channel plans to cover entire India.

The channel is also available on Internet on –www.lordbuddhatv.org – where devotees and followers can watch from any part of the world through live streaming. “The site gets over thousand visits daily from Buddhist countries like China, Thailand, and Myanmar,” says Nilesh Farkade, a student of mass communication, now working with the channel.

Officials from many other channels had visited Lord Buddha’s office to learn the new technology with which its contents are broadcast in the country without going to Delhi or other metro cities. “It has good backup facility with two dedicated four MBPS lines and invertor which can last up to 10-12 hours,” adds Farkade.

The channel plans to cover the annual Dhamma Chakra Din celebrations to be held at the historic Deekshabhoomi where Dr Ambedkar first embraced Buddhism. “We will be setting up a dedicated studio on the premises and will show non-stop coverage for complete two days. We recently covered the Sri Lankan President’s visit to Sanchi Stupa in Madhya Pradesh and also covered some programme in Bihar and in Mumbai’s Chaityabhoomi,” he says.

Some shining knights

Kunal Kamble | Cameraman
This HSC failed boy was working as a daily wager till he came in contact with Sachin. He took intensive training in operating cameras from his mentor and worked for a local channel for some period. When Lord Buddha channel started, he returned to join his mentor as head technician of the channel. His father works as a carpenter. Now, the entire team of cameramen works under him.

Nagesh Moon | Camerman
This youngster used to work as cleaner with the Nagpur Municipal Corporation. He is also SSC failed and approached Sachin when he got frustrated of his meagre salary. Sachin trained him in camera techniques and employed him in the channel.

Nikhil Kamble | Cameraman-cum-sub-editor
He also shares the same story as he too failed to clear SSC exam. He was also working in a local channel office as a peon. Sachin also trained him in camera techniques and now he is posted as a cameraman-cum-sub-editor at Lord Buddha’s office in Delhi.

Source :- Times Of India 

Friday 23 November 2012

26 नोव्हेंबर.....संविधान दिन....!









26 नोव्हेंबर.....संविधान दिन....!


                                                                           

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ ,१९५०पासून राज्यघटना अमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतीलप्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे


१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ ,१९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट १५१९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.


         ऑगस्ट २९, १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत

सध्या राज्यघटनेत ४०० कलमे असून; भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
 करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे.

चार वर्षापूर्वी 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून संविधान विरोधकांना आणि मनुवाद्याना संविधान दिवसाला विरोध करण्यासाठी एक चांगले कारण भेटले आहे. म्हणून हे नमुने काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा हा प्रत्यन लोकशाही मानणार्यांनी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी हाणून पाडायचा आहे.

देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, आपले जातीभेत, वंश भेद, धर्म बाजूला ठेवून सारे एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.

तरी सर्वाना विनंती आहे आज पासूनाच आपण संविधान दिन निमित्त माहितीपूर्ण आणि प्रबोधनपर पोस्ट टाकाव्यात, आणि आप आपल्या स्थानिक पातळ्यावर २६ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत........!

Thursday 22 November 2012

पितृ देवो भव



पितृ देवो भव

मुलांना धाक वाटणारे ‘वडील’ गायब होऊन, मुलांना मित्र वाटावा असा बाबा गेल्या दहा वर्षांत बघायला मिळत आहे. ‘अहो बाबा’ ऐवजी ‘ए बाबा’ म्हणणारी पिढीही आता मोठी होऊ लागली आहे. आई-वडील हे जवळचे मित्र-मैत्रीण वाटावे, असे दिवस आले आहेत. आई-वडिलांचे आभार मानण्यासाठी त्यांचे असे खास दिवस साजरे करण्याचं लोण आता आपल्याकडेही आलं आहे. विरोधासाठी विरोध करणारे याला फॅड म्हणतीलही, पण आपल्या आई-वडिलांचे ‘आभार’ मानायला एक दिवस मिळतो, हेदेखील आहेच ना! अशा दिवसांच्या निमित्तानं खास काही करता येतं. त्यामुळे ते दिवस, ते क्षण केवळ त्यांचे म्हणून साजरे करता येतात.
तब्बल बावन्न देशांमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. १९१० मध्ये पहिला फादर्स डे साजरा केला गेला. आपल्याकडे मात्र फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांचे आभार मानायची पद्धत सुरू होऊन एक तपही उलटलेलं नाहीये.
परवाच अनेक र्वष एकमेकांशी न बोललेले, भेटलेले मुलगी आणि वडील यांच्या हृद्य भेटीबद्दल वाचलं आणि मन भरून आलं. वीसहून अधिक र्वष मुलीचं आणि वडिलांचं काही भेटणंच झालं नव्हतं. आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर मुलगी आईकडेच राहात होती. कोणालाही न कळवता आई-मुलगी दुसरीकडे राहायला निघून गेले. वडिलांना मुलगी कुठे आहे याचा पत्ताच आईने लागू दिला नाही. दरम्यान वडील मुलीला शोधत होते. वडील आपल्याला का भेटायला येत नाहीत, याचा विचार करून मुलगी मनात कुढत होती. त्यातच तिला कॅन्सर झाल्याचं कळलं आणि ती पार कोलमडून गेली. तिची आईदेखील वारली होती. वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या मुलीने महत्प्रयासानं वडिलांना शोधून काढलं. शेवटी वडिलांचा पत्ता लागला आणि भेटल्यावर तिनं वडिलांना प्रश्न विचारला की, तुम्ही मला भेटलात का नाही? वडील म्हणाले, ‘मी तुला खूप शोधलं, पण मला तुझा काहीच पत्ता लागला नाही.’ ते वडील आता केमोथेरपीच्या वेळी तिची सोबत करतात. तिला धीर देतात. पितृछायेत तिला वेदनांचाही विसर पडला आहे. तिचा नवरा तिला, मुलं व तिच्या वडिलांना जपत आयुष्याचे गहिरे रंग अनुभवत आहे.
ही एकच नाही तर मुलं आणि वडील यांच्या अनोख्या नात्याच्या कितीतरी गोष्टी आपण आजूबाजूला पहातो. भारतात अशा ‘डेज’ची टिंगल होते याचे अजून एक कारण आहे. आशियाई देशांत विशेषत: भारतात आपण तसे कुटुंबापासून तुटलेले नसतो. लग्न झाल्यानंतर एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाण्याची वेळ (म्हणजे आई-वडिलांपासून दूर जाण्याची वेळ) फक्त मुलींवरच येते. तसेच आई-वडील सतत मुलांच्या संपर्कात असतात. सकाळी उठलं की मातृ-पितृदर्शन होतंच. मुद्दा असा की, ऊठसूट प्रेम व्यक्त करण्याची आपली पद्धत नाही. आणि मुलानं आई-वडिलांचे काय आभार मानायचे, अशीच आपली भावना असते; परंतु आपली संस्कृतीही सांगते - ‘मातृ देवो भव आणि पितृ देवो भव.’
इथे आणखी एक घटना सांगाविशी वाटते- सदतीस वर्षांचा तरुण.. खूप खूप बीझी.. पुढे जायची धडपड, त्याचा असह्य ताण.. लग्नं झालं, दोन मुली झाल्या. मग आपल्याला मिळालं नाही ते सर्व मुलींना मिळावं म्हणून अजून काम.. अजून स्पर्धा.. कोणाशी बोलणं नाही, गप्पा नाहीत. मित्र-मैत्रिणी कमी झालेले, बायकोशी मुलींचा विषय सोडून काय बोलायचं ते कळू नये इतका संवाद खुंटलेला.. एक दिवस त्याला ब्रेन हॅमरेज होऊन इमर्जन्सी रूममध्ये हलवावं लागलं. तो वाचला. त्यानं त्या दिवसाच्या आठवणी सांगताना म्हटलं- ‘डोक्यात काहीतरी खूप मोठ्ठं फुटत आहे, तसं वाटत होतं. नजरेसमोर अंधार होता; तेव्हा माझ्या मनाला करिअर, काम, पगार, पैसा यातल्या कशाचाही विचार शिवला नाही. माझ्या मुली, बायको आणि माझे हरवलेले मित्र-मैत्रिणी डोळ्यांसमोर आले. जे महत्त्वाचं नव्हतं त्या कशाचीच आठवण झाली नाही. आयुष्यभर मी जे महत्त्वाचं आहे त्यापासून पळत राहिलो. आता लक्षात येतंय की, माझ्यावर प्रेम करणारे माझ्यासोबत असणार होते. या आजारानं मला कोणचं किती आणि काय महत्त्व आहे, हे दाखवून दिलं.’ या माणसाची गोष्ट दोन महिन्यांपूर्वी मी टीव्हीवर पाहिली; परंतु आजही त्याचा प्रत्येक शब्द मला अजून जसाच्या तसा आठवतो आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते ती महत्त्वाच्या गोष्टी ठरवायची.. त्यांना त्यांचं देणं द्यायची.. ते केवळ कोणत्या तरी ओझ्यातून मुक्त व्हावं किंवा हिशेब चुकता करावा म्हणून नाही, तर नात्याचं आणि पर्यायानं आयुष्याचं आपल्यालाच ओझं होऊ नये म्हणून.. म्हणूनच फादर्स डे साजरा करावा की नाही या वादात पडण्यापेक्षा वडिलांना घेऊन एखादा सिनेमा बघणं, त्यांच्याशी एखादा खेळणं, त्यांना जेवायला घेऊन जाणं, त्यांच्या पसंतीची जुनी गाणी ऐकणं, त्यांना एखाद्या नाटकाला घेऊन जाणं, त्यांना हवं असलेलं एखादं पुस्तक देणं, त्यांच्या आवडीची गोष्ट देणं आणि आपल्याला ते अजूनही हवे आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून देणं, यात खासा आनंद आहे.
अमेरिकेमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करतात. आपल्या वडिलांचे आभार मानायला हा दिवस असतोच, पण अमेरिकेत पित्यासमान व्यक्ती, आजोबा, पणजोबा यांचीही आठवण काढली जाते. सोनोरा स्मार्ट डॉड ही महिला १९०९ मध्ये मदर्स डेच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना वडिलांसाठीही असाच सोहळा झाला पाहिजे, असं तिच्या मनानं घेतलं. तिच्या वडिलांनी विल्यम स्मार्ट यांनी पत्नीच्या निधनानंतर तिच्यासह पाच भावंडांना मोठय़ा प्रेमानं मोठं केलं होतं. सोनोराच्या या कल्पनेला अमेरिकेत सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटी १९७२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डेला सरकारी मान्यता दिली. खास वडिलांसाठी विविध भेटकरड, वस्तूंनी अमेरिकेतली बाजारपेठ सजते. आता केवळ अमेरिकेतच नव्हे, तर तब्बल बावन्न देशांमध्ये वडिलांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा हा सोहळा साजरा केला जातो.

Sunday 11 November 2012

बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये...!






  • बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये...!

    दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे आपण अनेक वर्षापासून सातत्याने ऐकत आलो आहेत.हिँदु धर्मामध्ये असे अनेक सण येत असतात.कधी कधी एकाच महिन्यात अनेक सण येत असतात.र्शावण महिना हा तर सण आणि उत्सावाचाच म्हटले तरी वाबगे ठरणार नाही.गणेशोत्सव,दहीहंडी,दसरा,नवराञ आणि दिवाळी ही त्यातल्या त्यात विशेष महत्वाची असते.यामध्ये बहुजन समाज हा मोठ्या संख्खेने गुंतलेला आणि गुरफरटलेला आहेँ.यामध्ये पुजारी आणि पुरोहित समाज र्पत्यक्ष सहभागी होत नाही. परंतु पुचा अर्चा विधीसाठी माञ आवर्जून हजर राहतील नव्हे त्यांच्याशिवाय ते कार्य होऊच शकत नाही.त्याला हिँदूचे धार्मिक ग़ंथ,स्मृती,पुराणे,रामायणे,महाभारत इत्यादी साक्ष आहे.पत्येक उपवास,सण,पूजाविधी यांचा संबंथ हिंदु धर्म आणि त्यांचे देवदेवता यांच्याशी जोडलेला आहे.त्यामुळे सर्व सामान्य माणुस हा या ना त्या कारणाने त्याचाशी जोडला गेला आहे.अलिकडे आजची तरुणपिढी हे देवधर्मापेक्षा हौसे,गवसे,नवसे यामध्ये सहभागी होऊन खाओ,पिओ,मजा करो अशा व् त्तीची झाली आहेत. आता सण उत्सव "हायटेक" झाले आहेत.त्यामध्ये धार्मिक संस्था,व्यापारी आणि पुजारी पुरोहित धार्मिकद्ष्टीपेक्षा व्यापारीद्ष्ट्या ठेवून त्याचा फायदा घेत आहेत.काही हिँदुत्ववादी धार्मिक संस्था,राजकिय संस्था,व्यक्ती यांनी हिँदु धर्माच्या र्पचार र्पसाराकरिता राञंदिवस एक केला आहे. त्यासाठी त्यांनी विशेषतः इलेर्क्टोनिक मिडीयाला हाताशी धरले आहे. त्यामध्ये काही दूरदर्शन वाहिन्या खास त्यांचाच आहेत तर काही आपली टीआरपी वाढवण्यासाठी हिँदुत्वाचा र्पचार र्पसार करीत आहेत.दुरदर्शन वाहिन्यांवर दाखविल्या जाणार्या मालिक(सर्व भाषिक मालिका) पाहील्यास हे दिसून येते की,हिँदुचे जे जे सण असतील त्याचे महत्व- पूजा त्या मालिकेतील कथानकातून दाखविली जाते. त्याचासारखा मारा केला जात आहे.त्यामुळे विशेषतः महिला वर्ग फारच र्पभावित होत आहेत. तसेच बहुजन समाज त्याच्या आहारी जात आहे.जे काम र्पबोधन होत नाही. ते काम दुरदर्शन वाहिन्यांमुळे होते.तसेच बाबा,बापु,गुरु,अम्मा,माताजी,देवर्षी इत्यादी अध्यात्मिक गुरुंनीही बहुजनांवर मोहीनी घातली आहे.बहुजनांच्या दान दक्षिणावरच हे अध्यात्मिक गुरु खास संस्थानिक झाले आहेत. त्यांनी करोडोची स्थावर आणि जंगम संपत्ती जमा केली आहे.बहुजनांबरोबरच बौद्ध समाजही त्यांच्या आराही गेला आहे.बहुजन समाज हा स्वतःला 'हिँदु'च समजतो. परंतु त्यांच्या जातीर्पमाणे त्याचा स्तर समजला जातो.बौद्ध समाज हा आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या बुद्ध धम्मामार्गाने र्कमण करित आहे.ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला तो आता "बौद्ध" झाला.बुद्ध धम्म हा हिँदु धर्माहुन सर्वस्वी वेगळा आहे.बुद्ध धम्मात देवाचे अस्तित्व नाकारले आहे तर हिँदु धर्मात तेहतीस कोटी देव आहेत.आपले इप्सित पूर्ण करण्याकरिता हिँदु धर्माच्या देवांना साकडे घालावे लागते.त्यासाठी नवस,दान,दक्षिणा,अभिषेक,पूजा या माध्यामातुन व्हाया पुजारी-पुरोहित याच्याकडुन देवाकडे जावे लागते.बुद्ध धम्म हा पटला तर स्वीकारा इतके स्वातंञ्य देतो, ज्या डॉ.बाबासाहेबांनी आपल्यासाठी जो महान धम्म दिला,त्यासाठी बावीस र्पतिज्ञाही दिल्या, त्यामाञ आपण नाकारुन पुन्हा "येरे माझ्या मागल्या" करित आहोत.म्हणुनच हिँदुचे सण-उत्सव आपले नाहितच म्हणूनच ते साजरे करु नयेत.दिवाळी ही आपली नाही हे ओघाने आलेच.दिवाळी म्हणजे आपल्या पुर्वजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्याचा हिँदूचा सण आहे.दिवाळीच्या अमावस्येला हिँदुनी ईसिगिल पर्वतावर महामोग्गलानची हत्या करण्यात आली तो दिवाळीचा दिवस होता.बौद्ध आणि बहुजनांनी त्याचा अवश्य विचार केला पाहिजे.म्हणुनच घरावर विद्युत रोषणाई,आकाश कंदील,दिवे,रांगोळी यापैकी काहीही करु नये.त्यापेक्षा आपले सण भीमजयंती,बुद्धजयंती,धम्मचर्क परिवर्तन दिन.र्पत्येक महिन्याच्या पोर्णिमा साजर्या कराव्यात.दर रविवारी बुद्ध विहारात गेलच पाहिजेँ.जे येतील त्यांच्यासह जे येणार नाहीत त्याच्याशिवाय धम्मपालन केलेच पाहिजे.आपल्या धम्म आचरणाने इतरांना र्पर्वूत्त करावे.केवळ इतरांना उपदेशाचे डोस पाजून काहीही उपयोग नाही.

Tuesday 6 November 2012

Information about MATA RAMAI BHIMRAO AMBEDKAR.



Ramabai (1896-1935) worthy daughter of Bhiku Dhutre of Wanand a village in the Dapoli sub-division. Ramabai was married to Bhimrao in 1906. Though Babasaheb married in 1906 at age of 17 his real martial life was to start now. When he again gone to England money was soon finished. Ramabai's brother Shanker and sister Gaurabai were labours. Their earning was just eight or ten 'Ana' that day. Ramabai
bought groceries from it and cooked the food. Sometimes they slept with hungry stomach. This conditions was send to Babasaheb by mail, on it Babasaheb said that " I am in same circumstances I don't have money to buy a food I don't have money to. send you. If circumstances might be hard then sell the ornaments, I will give new one when I' ll be back. In the same letter Babasaheb made an inquiry for Yashawant and Mukund. When Babasaheb came back to India some social welfare want to give some money and award But Babasaheb politely and clearly refused it.
Ambedkar did his utmost to mitigate his wife's sufferings. Medicines cures curable diseases. It could not cure here wasting disease, and the cruel bowl came to him on May 27, 1935, when the last spark of his wife's life flickered out. Ramabai was a symbol of contentment of heart, nobility of mind and purity of character. During the preceding six month she was struggling with her malady. She had grown weaker and weary ; her cheeks were sucked and colourless. Her great gift to mind alone enable her to endure with cool fortitude the hardships and sorrow that fell to her lot in those early friendless days of wants and worries. The grandeur and glory attached to Rajgriha could not distract her mind from the realities of life. She had passed the major portion of her life in pinching poverty, spent days and nights in anxiety for her husband's safety and health, observed rigid fasts, on Saturdays took only water and black gram, worshipped God, and invoked his blessings on her Saheb. Her eyes, her hands and her thoughts were devoted to the service of her Saheb. Gentle by temperament and frail by constitution, she was sober in manners, modest in speech, practical in her approach and generous in her dealings.
In her anxious moments she often blamed the conveyers of meetings and conferences that gave her husband no respite and created dangerous situations for him. She said that she could not understand why on earth so many conferences were required to teach and preach to the people. One day she had packed her luggage and insisted on her being taken to the conference at which her Saheb was to preside, so that she might not pass her days in his absence in utter restlessness. There was a little voilent quarrel, and the Saheb dissipated her fears as arrant nonsense.
Profoundly religious, she had a great longing for making a pilgrimage to Pandharpur where every year lakhs of believing Hindus bow their hands in devotion. But being an Untouchable Hindu lady, she would have been required to stand at a certain distance from the temple and offer her prayers. Self-respecting Ambedkar could not tolerate the idea and consoled her by saying : "What of that Pandharpur which prevents its devotees from seeing the image of God, by our own virtuous life selfless service and spotless sacrifice in the cause of the down trodden humanity we would create another Pandharpur."
Ambedkar had been on a week-end visit to Dr. Sadanand Galvankar at Bassein. He had returned on the previous night. Fortunately he was near her death-bed. About 10,000 people, rich and poor eminent and common, attended her funeral procession, Ambedkar walking by with a heavy heart, his eyes grave, pensive and dry with sorrow. On his return from the cremation grounds, he kept to his room, a lonely being tortured with sorrow. For a week he wept bitterly like a child, and it was difficult for his friends to console him. The Goddess of his prosperity, partner in the cause of humanity, his better-half in this earthly voyage, had departed this life. Unbeliever and destroyer of false notions of priesthood, Ambedkar in his divine love for his wife got all the funeral obsequies performed by his son in the Hindu tradition at the bidding of a Mahar priest by name Shambhoo More, who was Ambedkar's colleague since school days. some simple, believing men and women said that it was the prompting of this calamity that had made Saheb, a few days earlier, put on a hermit's dress and bid farewell to the earthly joys and happiness. He got his head tonsured. The serious face, grave and wide eyes, grim surroundings and his saintly saffron robe presented people the appearance of a hermit with a world-negating attitude

Wednesday 10 October 2012

उद्दिष्टापासून ढळलेला रिपब्लिकन पक्ष
वैभव छाया

सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकणारा एक ताकदवर विरोधी राजकीय पक्ष असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. परंतू सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे. सर्वाना सामावून घेण्यासाठी निर्मिलेल्या पक्षाचेच आज ४४ गट पडलेले आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एका दशकभरानंतर उदयाला आलेला रिपब्लिकन पक्ष मात्र आजच्या घडीला राजकारणातील आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते स्थान किंवा अस्तित्व त्यांना परत मिळेलच याची आशा फार धूसर होत चालली आहे. सध्या रिपब्लिकन चळवळींवर विचारांची घुसळण जोरदारपणे चालू आहे. काही अतिहुशार स्वघोषित विचारवंत सोशल नेटवìकग वेबसाइट्सवर रिपब्लिकन पक्षांवर वाटेल ती टीका करण्यात धन्यता मानत आहेत. वेगवेगळ्या ग्रुप्सवर टाकलेल्या पोस्टवर हजारो कमेंट्सने फेसबुकचे रकानेच्या रकाने भरून निघत आहेत. त्या साऱ्या चर्चेवरून रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन चळवळ आजच्या पिढीला नीटसा कळला नसल्याचेच दिसून येते आहे. या साऱ्या चर्चामध्ये पक्षाची उत्पत्ती व व्यूत्पत्ती, त्याची संकल्पना, तत्त्वज्ञान, बाबासाहेबांनी जनतेस उद्देशून लिहिलेले खुले पत्र याबद्दल नेहमीच उदासीनता बाळगलेली दिसते. अध्र्या हळकुंडात पिवळे होउन फेसबुकचा वेबस्पेस वाढविणाऱ्या त्या साऱ्या बोरूबहाद्दरांसाठी खास रिपब्लिकन पक्षाच्या तत्वप्रणालीवर टाकलेली ही नजर. .
संसदीय राजकारणावर व समताधिष्ठित राजकीय तत्वज्ञानावर उच्चतम विश्वास असणारा रिपब्लिकन पक्ष सध्या राजकीय अडचणीतून बाहेर येण्याचा जोरदार प्रयत्न करतोय. तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रखर विरोधी पक्ष असावा म्हणून आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे, डॉ. लोहीयांसारख्या समाजवादी नेत्यांना सोबत घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. बाबासाहेबांनी याकरिता भारतीय जनतेला एक खुले पत्र देखील लिहिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. या लोकसत्ताक विचारसरणीवर उभ्या राहिलेल्या पक्षाच्या निर्मितीमागील बाबासाहेबांची व्यापक भूमिका व इतिहास समजून घेतल्याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे खरे महत्त्व कळणे अशक्य आहे.
भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ साली प्रथमच घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेस पक्षाने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ४८९ जागांपकी ३६४ जागांवर विजय संपादन करत बहुमताचे सरकार स्थापन केले. १८८५ साली काँग्रेस पक्ष हा परकिय सत्तेविरोधात यल्गार पुकारून देशात स्वातंत्र्य निर्मितीचे ध्येय घेउन स्थापन झाला होता. १९४७ साली साध्य प्रत्यक्षात सिद्ध होताच गांधीजीनी काँग्रेसला बरखास्त करण्याचा सल्ला देखील दिला होता. पण तो सल्ला मानला गेला नाही. अशा वेळी लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकणारा एक ताकदवर विरोधी राजकीय पक्ष असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना सर्वासमोर मांडली. ही संकल्पना मांडताना १९५४ पर्यंतच्या राजकारणाचा र्सवकष अभ्यास, शेल्ड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा इतिहास व भविष्यातील आव्हानांचा आढावा घेऊनच रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती.
बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची आखणी करताना फार मोठी दूरदृष्टी ठेवली होती. सर्वसमावेशक राजकारणासाठी सर्वाना सामावून घेता येणारा एक प्रबळ राजकीय विचारमंच त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यामातून लोकांना द्यायचा होता. परंतु, सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे.
१९५१-१९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकात देशभरातील एकूण ५४ विविध प्रांतीय व राष्ट्रीय पक्षांनी सहभाग घेतला होता. त्यात काँग्रेसव्यतिरिक्त कोणालाही वाखाणण्याजोगे यश मिळाले नव्हते. दरम्यानच्या काळात बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते. सोबत सर्वसमावेशक अशा नव्या राजकीय पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. यासंदर्भात १० डिसेंबर १९५५ रोजी जनता पाक्षिकात बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक होती. ते म्हणाले की,
‘‘माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढण्याचा विचार आहे. भारतीय राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबविण्यासाठी हा पक्ष काढण्यात येणार असून पक्षाचे मुख्य ध्येय समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव असे राहणार आहे. भारतातील सत्ताधारीकाँग्रेसला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान पक्षांचे या नवीन पक्षांत एकत्रीकरण करण्यात येईल आणि अमेरिकन धर्तीवर हा पक्ष कार्य करीत राहील. भारतातील व्यापारी वर्गाने अमेरिकेतील व्यापारी वर्गाप्रमाणे सत्ताधारी व विरोधी पक्षास सहकार्य केल्यास दोन्ही पक्ष मजबूत पायांवर काम करू शकतील व त्यामुळे लोकशाहीच्या निरोगी वाढीस मोठा हातभार लागू शकेल.
लहानसहान पक्षांजवळचे मामुली निधी, कार्यकर्त्यांची वानवा, या गोष्टी लक्षात घेता सध्याच्या राजकीय वातावरणात अशा पक्षांना बिलकूल भविष्यकाळ नाही. सरकारने व देशभक्तांनी अमेरिकेप्रमाणेच काँग्रेस व रिपब्लिकन पक्षांच्या वाढीस प्रोत्साहन द्यावे. उदाहरणादखल घ्यायचे झाल्यास, गेल्या निवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला काही हजार रुपये ही खर्च करता आले नाही. या उलट काँग्रेस पक्षाने कास्ट फेडरेशनचा पराभव करण्यासाठी अमाप पसा खर्च केला. ’’
वरील प्रतिक्रियेतून सहज लक्षात येण्यासारखी एक गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची आखणी करताना फार मोठी दूरदृष्टी ठेवली होती. सर्वसमावेशक राजकारणासाठी सर्वाना सामावून घेता येणारा एक प्रबळ राजकीय विचारमंच त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यामातून लोकांना द्यायचा होता. परंतु, सद्यस्थितीतील सर्वच स्वघोषित रिपब्लिकन नेत्यांना या भूमिकेचा विसर पडलेला आहे. किंबहुना ते त्याचे सोंग घेत असावे. सर्वाना सामावून घेण्यासाठी निर्मिलेल्या पक्षाचेच आज ४४ गट पडलेले आहेत. एकेकाळी स्वाभिमानी रिपब्लिकन जनता अशी ओळख असणाऱ्या वर्गाला स्वार्थलोलुप नेतृत्वाने व त्यांच्या स्वसंस्थापित नेतृत्वगटाने व्होट बँकचा दर्जा मिळवून दिला. आणि एका प्रकारे राजकीय अध:पतानाला सुरूवात करून दिली.
बाबासाहेबांनी १३ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते की, धर्मातरानंतर कदाचित शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष अस्तित्वात राहणार नाही. मात्र धर्मातरानंतर मी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा सदस्य राहणार नसून लवकरच रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात येईल. मी त्या पक्षाची घटनाही तयार केली आहे. त्याच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन प्रमुख तत्वांवर हा पक्ष आधारलेला राहील. पार्लमेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची कसोटी या तीन निकषांवर पाहिली जाईल. या पक्षाला स्वत:चे असे तत्वज्ञान असेल.
कोणत्याही राजकीय पक्षाला तत्वज्ञानाएवढेच एखाद्या कणखर नेत्याची आवश्यकता असते, हे बाबासाहेबांनी निक्षून संगितले होते. एका प्रबळ राजकीय पक्षाच्या निर्मितासाठी आणि त्याच्या सशक्त वाढीसाठी लागणारे सारे आवश्यक घटक भारतीय जनतेस रिपब्लिकन पक्षात सामील होण्यासाठी लिहिलेल्या खुल्या पत्रात उद्धृत केले आहेत. खुले पत्र केवळ एक पत्र नसून एक भक्कम विचारसरणी आहे. रिपब्लिकन पक्षाची मुहूर्तमेढ याच विचारसरणीवर व त्यातील तत्वज्ञानावर आधारित आहे. हे तत्वज्ञान काळानुरूप स्वत:मध्ये बदल घडवणारे असून जगातील कोणत्याही राष्ट्रात लोकशाहीची स्थापना व तिच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. जगातील वैफल्यग्रस्त राष्ट्रांत रक्तहीन क्रांती घडवून आणण्यासाठी तिची क्षमता अत्यंत प्रभावी आहे. त्यांचे विश्लेषण पुढील काही मुद्दयांच्या आधारे करता येऊ शकेल.
विसाव्या शतकात जातीव्यवस्थेने हळूहळू आíथक व्यवस्थेचे स्वरूप प्राप्त केले होते ज्यात लोकशाहीवादी राष्ट्र असूनही मूठभरांनी बहुसंख्यांकांवर आजन्म वर्चस्व गाजविण्याचे जन्मसिद्ध अधिकार मिळविल्याचे प्रतीत होत होते.
१. ही विचारधारा केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा पुरस्कार करून थांबत नाही तर कोणत्याही चळवळीचे राजकीय चळवळीत रुपांतर होताना कोणती स्थित्यंतरे होतात याची शास्त्रशुद्ध मांडणी करते.
२. लोकशाहीचा पुरस्कार करताना अधिकाअधिक संसदीय लोकशाहीचे महत्त्व व तीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पटवून देते.
३. लोकशाहीचे भविष्यातील बदलणारे स्वरूप, तिच्या उद्दिष्टांवर भाष्य करताना आधुनिक लोकशाहीचा पर्याय सुचविते. सोबत आधुनिक लोकशाही तिचे नेमके उद्दिष्ट आणि त्यांची योग्य व्याख्या हे खुले पत्र अतिशय नेटकेपणाने करते.
४. लोकशाहीच्या यशस्वी सिद्धीसाठी आवश्यक असणारे घटक :-
 विषमतारहित समाज
 विवेकबुद्धी बाळगणारा प्रखर संसदीय विरोधी पक्ष
 वैधानिक व कारभार विषयक क्षेत्रांत पाळावयाची समता
 संविधानात्मक नीतींचे कसोशीने व नतिकतेने करावयाचे पालन
 अल्पसंख्यकांची सुरक्षा
 राज्यशास्त्राधिष्ठित नीतीमान समाजव्यवस्थेची आवश्यकता
 विचारी, जागरूक, विवेकी जनमत
इतकी प्रभावी विचारप्रणाली आजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या घटनेमध्ये अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही. या खुल्या पत्रांचे विवेचन करताना तत्कालिन रिपब्लिकन नेते अ‍ॅड. बी. सी. कांबळे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्राचा संदेश भारताच्या कानाकोपऱ्यात आणि भारतीय लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत निकडीचे आहे. त्याचप्रमाणे, जणू हे खुले पत्र जगातील लोकांस उद्देशून आहे असे समजून, खुल्या पत्राचा संदेश राष्ट्रसंघापर्यंत व शक्यतो जगातील लोकांपर्यंत पोहोचवणे तितकेच निकडीचे आहे. कोणी हे कार्य करील तर ते जगाच्या धन्यवादाला पात्र होतील. कोणी हे करो वा न करोरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणाऱ्या तमाम लोकांनी हे कार्य करण्यास पुढे यावे जगाचा व भारताचा बचाव रक्तपातापासून करावा.
बाबासाहेबांनी आपल्या भाषणात संदेश दिला होता, जा आपल्या घरातील िभतीवर लिहून ठेवा की, मला या देशातील शासनकर्ती जमात व्हायचे आहे. बाबासाहेबांचा हा संदेश तर सर्वानी ऐकला. पण त्यासाठी करावी लागणी तपस्या, ती तपस्या यशोसिद्धीस नेण्यास करावी लागणारी प्रयत्नांची पराकाष्ठा, या सर्वावर ज्या र्सवकष विवेकबुद्धीने, वस्तूनिष्ठ दृष्टिकोनातून जे सखोल चिंतन व्हावयास हवे होते ते आजवर झालेले नाही. यासाठी सांप्रत ४४ गटां-तटांत विखुरला गेलेल्या व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जबाबदार धरावे का? की त्यांना कोणत्याही प्रकारचा जाब न विचारणाऱ्या अविवेकी जनमत बाळगणाऱ्या मतदारांना जबाबदार धरावे? या दोन प्रमुख प्रश्नांची कारणे आपणच शोधायला हवीत.
विसाव्या शतकात जातीव्यवस्थेने हळूहळू आíथक व्यवस्थेचे स्वरूप प्राप्त केले होते ज्यात लोकशाहीवादी राष्ट्र असूनही मूठभरांनी बहुसंख्यांकांवर आजन्म वर्चस्व गाजविण्याचे जन्मसिद्ध अधिकार मिळविल्याचे प्रतीत होत होते. बाबासाहेब कोणतेही सुधारणावादी आंदोलन उभारून त्याचा रेटा पुढे ओढत राहू शकले असते, पण त्यापेक्षा धर्मातराचे काँक्रिट सोल्यूशन जातीव्यवस्थेच्या फुटक्या िभतीवर लावले आणि विषमतारहित भारतीय समाजाच्या भक्कम पायाभरणीसाठी रक्तहीन समाजक्रांती घडवून आणली. भारतीय जनतेस ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला पािठबा देण्यासाठी आवाहन करणाऱ्या खुल्या पत्राचा साकल्याने अभ्यास व्हावयास हवा. कारण समाजक्रांतीप्रमाणे बाबासाहेबांना राजकीय क्रांती देखील अपेक्षित होती. तिचा उगम व स्थापना ही रिपाईच्या माध्यमातून व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले होते. पक्ष कसा असावा त्यासाठी आवश्यक असलेल्या भूमिकेचा आणि तत्वज्ञानाचा, नतिकतेचा सबगोलंकारी परिप्रेक्ष्यातून अध्ययन करताना वैचरिक दिग्दर्शन आणि त्यासंबंधीची दूरदृष्टी याबाबतची डॉ. बाबासाहेबांची भूमिकाच आपल्याला या खुल्या पत्रातून पहायला मिळते.
१. चळवळीची व्याख्या कशी करावी, तिचे उद्दिष्टपूर्तीनंतर राजकीय पक्षात होणारे रूपांतर किंवा त्या चळवळीला राजकीयपक्षाचे कालौघात प्राप्त होणारे स्वरूप यातील स्थित्यंतरे व त्यांचे आधुनिक संसदीय लोकशाहीत असलेले महत्त्व अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे.
२. आधुनिक संसदीय लोकशाहीचा अभ्यास व त्यात सक्रिय सहभाग नोंदविताना लोकशाहीचे स्वरुप (Form of Democracy) आणि तिचे उद्दिष्ट (Purpose) हे काळाप्रमाणे बदलत आलेले आहे. म्हणूनच आजची लोकशाही ही आधुनिक लोकशाही बनली असून या लोकशाहीचे उद्दिष्ट हे अनियंत्रित राजसत्तेवर नियंत्रण घालणे नसून, ‘लोककल्याण’ साधणे हे आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी लोकशाहीची दिलेली व्याख्या ही पुढीलप्रमाणे आहे. . ‘लोकांच्या आíथक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविहीन मार्गानी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजचे लोकशाही’ होय.
आज रिपब्लिकन चळवळीचे राजकीय अंग जवळजवळ रसातळाला गेले आहे. विविध पक्षांत असलेल्या बुद्धीवादी लोकांना त्यांचा इष्ट सन्मान मिळत नाही आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे एका जातीपुरती किंवा एका विशिष्ट नेत्यापुरती मर्यादित करून चर्चिली जात आहे.
३. राजकारणात सत्ताधारी पक्षाएवढीच विरोधी पक्षाची आवश्यकता असते. सृजनशीन व विवेकी जनमताच्या अभावामुळे लोकशाही राबविण्यात अडचणी येतात. सरकार व कायदेमंडळाचे कामकाज योग्य रीतीने पार पडण्यासाठी लोकमत ओळखता येणे गरजेचे आहे. प्रचाराधिष्ठित सरकार व लोकशिक्षणाचा पाया घालणारे सरकार यात असलेला मूलभूत फरक स्पष्ट केला पाहीजे. कारण प्रचार हा कायम एकांगी असतो तर लोकशिक्षणाधारित सरकार सांगोपांग चच्रेतून येणारे र्सवकष समाधान असते. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळे एकपक्षीय हुकूमशाही टळण्यास मदत होते.
४. पक्ष हा सन्यासारखा असतो. सरसेनापतीसारखा पुढारी (नेता), संघटना, सभासद, मुलभूत योजना शिस्त, पक्षाचे कार्यक्रम, राजकीय डावपेच व मुत्सुद्देगिरी या गोष्टींचा समावेश यात होतो.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -ध्येय व उद्दिष्टय़े
भारतीय घटनेची प्रस्तावना पुढीलप्रमाणे आहे-
‘आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आíथक व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य; संधी व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रऐक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू. ’
भारतीय घटनेच्या या प्रस्तावनेतील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व साध्य करणे हेच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट राहील.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सार्वजनिक व्यवहारात खालील तत्वांना बांधलेला राहील,
१) सर्व भारतीयांना समान न्याय मिळेल; एवढेच नव्हे तर समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे असे मानण्यात येईल. आणि यानुसार जेथे समता नाही तेथे ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथे ती नाकारण्यात येते, तेथे ती राबविण्यासाठी लढा देईल.
२) प्रत्येक व्यक्तीचे सुख हा केंद्रिबदू समजण्यात येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्तीस समान संधी मिळेल. शासन संस्था ही, हे ध्येय मिळविण्यासाठी वापरावयाचे साधन होय.
३) इतर देश बांधवांच्या हक्कांचे व शासन संस्थेच्या आवश्यक तेवढय़ा अधिकारांचे संरक्षण करून प्रत्येक नागरिकांस धार्मिक,आíथक,राजकीय स्वातंत्र्य असले पाहिजे असे हा पक्ष मानील.
४) प्रत्येक भारतीय नागरिकांस समान संधीचा अधिकार असल्याचे हा पक्ष मान्य करील. अर्थात, ज्यांना आत्मोन्नतीसाठी कधीच संधी मिळालेली नसेल त्यांना संधी मिळालेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याचे तत्व पक्ष अंगीकारेल.
५) प्रत्येक व्यक्तीस जीवनातील गरजा व भीती यापासून मुक्ती मिळवून देण्याच्या शासन संस्थेच्या कर्तव्याची जाणीव सरकारला हा पक्ष सातत्याने देईल.
६) हा पक्ष स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रह धरील आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाची, किंवा एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून होणारी पिळवणूक व दडपशाही यांना पायबंद घालील.
७) व्यक्ती व समाज या दोहोंच्या भल्याच्या दृष्टीने संसदीय राज्यपद्धती ही सर्वोत्तम राज्यपद्धती आहे अशी या पक्षाची श्रद्धा राहील.
आज रिपब्लिकन चळवळीचे राजकीय अंग जवळजवळ रसातळाला गेले आहे. विविध पक्षांत असलेल्या बुद्धीवादी लोकांना त्यांचा इष्ट सन्मान मिळत नाही आहे. रिपब्लिकन चळवळ म्हणजे एका जातीपुरती किंवा एका विशिष्ट नेत्यापुरती मर्यादित करून चर्चिली जात आहे. त्या सर्वानी उपरोल्लिखीत मुद्यांचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. अशा बलदंड राजकीय, सामाजिक व आíथक परिप्रेक्ष्यातून परजलेल्या तत्वज्ञानावर रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्याचा मानस बाबासाहेबांचा होता. अशा बांधणीचा, विचारसरणीचा, तत्वज्ञान जोपासणारा पक्ष राष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेसाठी कायम हितकारी राहील याचा त्यांना विश्वास होता. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी पक्षाची स्थापना झाली. आणि पाहता पाहता १९५७ सालच्या निवडणुकांत देशातील क्रंमांक चारचा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास देखील आला. हे अभूतपूर्व यश पाहण्यासाठी मात्र बाबासाहेब हयात नव्हते. 

Friday 28 September 2012

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?


खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

उद्या २९ सप्टेंबर २०१२ रोजी खैरलांजी हत्याकांडाला ६ वर्षे पूर्ण होतील, आणि कधीही बऱ्या न होणाऱ्या आमच्या काळजाच्या जखमा पुन्हा रक्ताळ्तील, उद्या या घटनेविरुद्ध कुठे शोक सभा होतील, कुठे श्रद्धांजली वाह
िली जाईल, कुठे निदर्शने केली जातील, एकाद्या न्यूज च्यानेल वर विषय घेतला जाईल आणि काही निकाल लागण्यापूर्वीच आमची वेळ संपली म्हणून विषय बंद हि केला जाईल, पण या सर्व गोष्टीतून आम्हाला मात्र तीव्र वेदना जरूर होतील, आमच्या आया, बहिणी, बांधव, या बेगडी पुरोगामी महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का ? आज हि कित्येक गावात सर्रासपणे रोज खैरलांजी घडत आहे, कित्येत भोतमांगे आज वेगवेगळ्या नावाने या जातीयतेचे बळी पडत आहेत. आज पुन्हा एकदा "Atrocities Act" आणि सरकारच्या जातीयता निर्मूलनाच्या हेतूवर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे, या निमित्ताने जाणून घेऊ खैरलांजी प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम.... तत्पूर्वी अमानुष जातीय हत्याकांडात बळी पडलेल्या भोतमांगे कुटुंबातील सुरेखा, प्रियंका, सुधीर आणि रोशन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.....!

महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून टाकणारे खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ ला घडले. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली.घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.

हत्याकांडाची पार्श्वभूमी आपण थोड्यात अश्या प्रकारे होती, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंब स्वाभिमानाने जगात होते, छोट्याश्या शेतीच्या तुकड्यामध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते, रोशन हा डोळ्याने अंध होता, प्रियांका शाळा शिकत होती, टापटीप आणि सुशिक्षित महाराची पोर जाता येता गावातल्या जात्यंध डोळ्यांना सलत होती, भोतमांगेच्या शेतामधून गावकऱ्यांसाठी रस्ता देण्यावरून अधून मधून खुसपूस होतच होती.

धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये भोतमांगे कुटुंबियांच्या ओळखीचा होता, त्याचे भोतमांगे कुटुंबियांकडे अधून मधून येणे जाणे होते, दुसऱ्या गावातील पोलीस पाटील या महारांच्या घरी येतोय, गावगुंड कसे आणि किती सहन करणार, त्यामुळे भोतमांगे कुटुंबीय गावगुंडाच्या नजरेत जास्तच सलत होते, गावातील अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारणा त्यागून भोतमांगे कुटुंबीय बाबासाहेबांच्या विचारावर चालत होते, सावित्रीची लेक बनून शिक्षणाचा ध्यास घेत होते, हेच गावगुंडांच्या विखारी नजरेस खुपत होते.... भोतमांगे कुटुंबाविरुद्ध आपला राग व्यक्त करण्यास फक्त एक कारण हवे होते आणि ते कारण एके दिवशी घडलेच....!

खैरलांजी गावचा सकरू बिंजेवार हा धुसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये याच्या शेतामध्ये काम करीत असे. त्याच्या मजुरीचे २५० रुपये सिद्धार्थने न दिल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यात सकरूला मारहाण करण्यात आली. त्याचा बदला घेण्यासाठी ३ सप्टेंबरला सकरूचा मुलगा गोपाल, शिवचरण मंडलेकर, कन्हैया मंडलेकर आणि जगदीश मंडलेकर यांनी सिद्धार्थ गजभियेचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. सिद्धार्थच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी १६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली. हा गुन्हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न होता नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार दाखल झाला होता.

"तुम्ही जामिनावर सुटले असला तरी सिद्धार्थ गजभियेची माणसे शस्त्रे घेऊन तुमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा सावध राहा", असे दिलीप ढेंगे याने भास्कर कढव याला मोबाईलवर सांगितले. हे ऐकून चिडलेल्या आरोपींनी सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ राजन यांचा शोध घेतला परंतु, ते दोघे सापडले नाहीत. त्यामुळे बदला घेण्यासाठी हे आरोपी भोतमांगे यांच्या घरी गेले.

सिद्धार्थ गजभियेच्या बाजूने साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून काठय़ा आणि सायकलच्या चेनने मारहाण करून हत्या केली. महिलांचा विनयभंग करून त्यांचे निर्वस्त्र मृतदेह बैलगाडीत टाकून साडेतीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात फेकून देण्यात आले. ही घटना घडताना या अमानुष हल्ल्यात एकमेव व्यक्ती वाचली भैयालाल भोतमांगे. भैय्यालाल वाचल्यामुळे सदर हत्याकांड उघडकीस आले, अन्यथा दररोज अश्या प्रकरच्या घडणाऱ्या घटनांचा सुगावा देखील लागत नाही, कारण प्रत्येक वेळी भैयालाल वाचत नाही.


या घटनेबाबत कळूनही सिद्धार्थने या कुटुंबाला काही मदत केली नाही. घटनेपूर्वी सुरेखाने तिचा भाचा राष्ट्रपाल नारनवरे याला फोन करून, आपण साक्ष दिलेली असल्याने काही घडू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. आपला आंधळगाव पोलिसांवर विश्वास नसल्याचेही तिने सांगितले. त्यावर, तू वरठीला येऊन जा, असे राष्ट्रपालने तिला सांगितले होते. मात्र, सुरेखा तिकडे गेली नाही आणि हल्ल्याला बळी पडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी प्रियंकाचे प्रेत वडगाव शिवारात सापडले.’ तिसऱ्या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सुरेखा, रोशन व सुधीर यांचे मृतदेह कालव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. पोलिसांनी याप्रकरणी आधी २८ जणांना अटक केली. नंतर इतरांच्या अटकेमुळे ही संख्या ४४ वर गेली. आरोपींकडून १२ काठय़ा आणि सायकलच्या ८ चेन जप्त करण्यात आल्या.

पोलिसांनी या प्रकरणी १ ऑक्टोबर २००६ ला गुन्हा दाखल करून २७ डिसेंबरला भंडारा येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सी.बी.आय. ने या प्रकरणी ४७ जणांना आरोपी केले होते परंतु, त्यापैकी ३६ जणांची न्यायालयाने सुटका केली. शेवटी ११ आरोपींवर खटला चालला. ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण ३६ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यापैकी महादेव झंझाळ हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाला. त्यासाठी याला ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

भंडाऱ्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी या प्रकरणाची सुनावणी करून १५ सप्टेंबर २००८ ला निकाल जाहीर केला. खून, पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीररीत्या मंडळी जमवणे व दंगा करणे, या आरोपांखाली त्यांनी आठ आरोपींना दोषी ठरवले. दोघांची पुराव्याअभावी तर, एकाला संशयाचा फायदा देऊन अशा तीन आरोपींची न्यायालयाने सुटका केली होती. या हत्याकांड प्रकरणी सुरवातीला ४७ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र, त्यांतील ३६ जणांची "सीबीआय'ने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर उरलेल्या अकरा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या हत्याकांड खटल्याचा निकाल भंडारा येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. दास यांनी २४ सप्टेंबर २००९ रोजी दिलेला आहे.

त्यातील आरोपींच्या शिक्षेला आव्हान देण्यात आले होते. सरकारच्यावतीने आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी आणि आरोपींविरोधात अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला मान्य करण्यात यावा म्हणून केंदीय गुप्तचर खात्याच्यावतीने दोन अर्ज करण्यात आले होते. त्यावर न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. आर. सी. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. तेव्हा ऍड. खान यांनी आज प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी न्यायालयासमोर सादर केली.

भोतमांगे कुटुंबीयांच्या हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार म्हणून भोतमांगे यांचा शेजारी मुकेश पुसाम याला सरकारी पक्षाने सादर केले होते. घटनेच्या वेळी पुसाम हा घरात होता. तेव्हा त्याला जगदीश मंडलेकर याचा जोराने शिवीगाळीचा आवाज आला. त्यामुळे पुसाम घराबाहेर येऊन उभा राहिला. तेव्हा जगदीश मंडलेकर याने शिवीगाळ करून भोतमांगे कुटुंबीयांना जीवे मारण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करताना पाहिले. जमावाचा आवाज ऐकून सुरेखा भोतमांगे घराबाहेर आली होती. तिने गोठ्याला आग लावली तसेच नंतर जमावाने तिला पकडून लाठ्या आणि सायकलचेनने मारताना पुसामने बघितले होते. पुसामने त्या सातही आरोपींची नावे न्यायालयात साक्षीतून दिलेली होती. तसेच त्याने दिलेली नावे ही न्यायदंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बयाणातही आहेत. त्यामुळे त्याची साक्ष ही प्रमुख मानली गेली. पुसामच्या साक्षीनुसार, आरोपींनी प्रथम सुरेखाला नालीत टाकून लाथा, काठी आणि सायकलचेनने मारले. नंतर तिचा मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. नंतर त्यांनी सुधीरला घेरून मारले आणि त्याचा मृतदेहही तिच्या शेजारी आणून ठेवला. त्यानंतर रामदास खंडातेच्या गोठ्यात लपून बसलेल्या रोशनला मारून तिथे आणले. तर प्रियांकालाही अशाप्रकारे मारून तिथे आणल्याचे पुसामने साक्षीत नमूद केले आहे. दरम्यान, रोशन हा त्यावेळी जिवंत होता. त्याने आपला जीव वाचविण्यासाठी आरोपींना याचना केली होती; मात्र भोतमांगे यांना मारल्याची बाब कुणाला सांगितली तर अशीच दशा केली जाईल; म्हणून जगदीश मंडलेकरने धमकावले होते. त्यामुळे घाबरून पुसाम आपल्या घरात गेला. तेथून त्याने आरोपींना भोतमांगे कुटुंबातील चौघांना बैलगाडीतून नेताना बघितले होते. त्यावेळी कोण बैलगाडी हाकत होता; तसेच त्यामागे कोण जात होते, त्यांची नावेदेखील पुसामने साक्षीतून दिलेली आहेत.

या प्रकरणात पोलिसांनंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला होता. मुख्य घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नाही, सुरेखा भोतमांगे हिचे शव कोठे सापडले याचा पंचनामा केलेला नसणे, घटनास्थळाचे वर्णन दोषपूर्ण आहे, असेही बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले. मुकेश पुसाम घटनेच्या दिवशी गावात नव्हता, असा युक्तिवादही करण्यात आला. ज्या बैलगाडीतून प्रेत नेण्यात आले त्याच्या मालकाचा जाब नोंदवण्यात आलेला नाही. शिवाय, हत्याकांडात वापरण्यात आलेली हत्यारे न्यायालयात दाखवण्यात आलेली नाही, असेही बचाव पक्षाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.

फाशीची शिक्षा सुनावण्यात झालेल्या ६ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेप ऐकवली. अन्य दोघांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. हायकोर्टाच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिगने हा निकाल जाहीर करताना न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. रवींद चव्हाण यांनी सकरू बिंजेवार, शत्रुघन् धांडे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर, विश्वनाथ धांडे, रामू धांडे यांची शिक्षा कमी केली. तर गोपाल बिंजेवार आणि शिशूपाल धांडे यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्का बसवला.

खैरलांजी हत्याकांड जातीयवादातून घडले आहे. त्यामुळे सर्व आरोपींना ऍट्रॉसिटीअंतर्गत शिक्षा करण्यात यावी, असा अर्ज सीबीआयने दाखल केला होता. 29 सप्टेंबर 2006 रोजी संध्याकाळी गावकऱ्यांनी अचानक भैय्यालाल भोतमांगे यांच्या घरावर हल्ला केला होता. तेव्हा आरोपींनी जातीयवाचक शिविगाळ करुन घरातील एकेका सदस्याला पकडून ठार मारले होते. भैय्यालाल भोतमांगे यांनी केलेल्या तक्रारीत आरोपींच्या जातीचा उल्लेख केला असला तरीही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांमध्ये आरोपींच्या जातीचा उल्लेख तक्रारीत असणे अनिवार्य नसल्याचे नमूद केले आहे. खटल्यादरम्यान एका साक्षदाराच्या साक्षीत पाच आरोपी हे कलार जातीचे असल्याचा उल्लेख आलेला आहे. सदर बाब सत्र न्यायालयाने ग÷ाह्य धरली होती.तरीही सर्व आरोपींची ऍटॉसिटीअंतर्गत निर्दोष मुक्तता करुन सत्र न्यायालयाने ज्युडिशिअल एरर (न्यायीक चूक) केंली असल्याचा युक्तीवाद सीबीआयचे वकील एजाज खान यांनी उच्च न्यायालयात केला होता. तसेच सर्व आरोपींना ऍट्रॉसिटी अंतर्गत शिक्षा करावी, अशी विनंती सीबीआयने केली होती. तर बचाव पक्षाने गावात जातीयवाद नसल्याचा दावा केला होता. तर सत्र न्यायालयाने ऍट्रॉसिटीतून मुक्त करण्याच्या निर्णयाचा आदर बचाव पक्षाने व्यक्त केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत सत्र न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. आरोपींना प्रियंका व सुरेखा यांच्या विनयभंगाच्या आरोपातून मुक्त करुन सत्र न्यायालयाने गुन्ह्याची तीव÷ता कमी केली, असा युक्तीवाद करीत सीबीआयने या गुन्ह्याखालीही सर्व आरोपींना शिक्षा करावी, असा अर्ज केला होता. मात्र, सीबीआयचा हा अर्ज देखील न्यायालयाने निकालात काढला आहे.

हत्याकांडातील सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावली, १४ जुलै रोजी देण्यात आलेल्या या निकालाला सीबीआय लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार होती . हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला भैय्यालाल भोतमांगे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती करणारी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेला जगदीश मंडलेकर 13 फेब्रुवारी 2012 ला पॅरोलवर एका महिन्यासाठी गावी खैरलांजी येथे आला. दरम्यान, दम्याचा त्रास वाढल्याने त्याच्या पॅरोलचा कालावधी एका महिन्याने वाढविण्यात आला. तो 13 एप्रिलला कारागृहात परत जाणार होता. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जर असेच एक एक आरोपी स्वत होऊन मरण पावू लागले तर न्यायचे काय ? आम्हाला न्याय कसा मिळणार जेव्हा या हरामखोर लोकांना फाशीवर लटकावले जाणार नाही तो पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, सदर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा दिली तरच कुठे यांचे जात्यंध हात पुन्हा असे कृतं करायला धजवणार नाहीत, सदर प्रकरणात मा.न्यायालयाने हा जातीवादाचा मुद्दा फेटाळून लावला याला जबाबदार सदर इच्छाशक्तीचा अभाव असलेले पोलीस खाते आणि सी.बी.आय. नावाचे कृत्रिम खेळणेच होय. राज्य शासन उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच आरोपींची फाशीची शिक्षा रद्द होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेलेली आहे. पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती कायदा सक्षम करण्याची आणि जातीयता गाडण्यासाठी कार्यक्षम कार्यप्रणालीची उणीव भासते...!

माननीय न्यायालयाने इतर हत्याकांडाच्या प्रकरणा सारखेच न्यायदानाच्या गोंडस नावाने निकाल तर दिला, परंतु जातीवादाच्या बळी पडलेल्या खैरलांजी हत्याकांडातील निरपराधाना खरोखर न्याय मिळाला का ?


संदर्भ - विविध ई न्यूज पेपर आणि न्यायालयाचे निवाडे....!


Tuesday 18 September 2012

गोलपिठा व ढसाळ यांविषयी:विजय तेंडूलकर



‘गोलपिठा’ या नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. हा काव्यसंग्रह मराठी साहित्यातला खर्‍या अर्थाने ठरलेला माईलस्टोन आहे. एकुण साहित्य जगतातील सारस्वतीय नियमांना सुरूंग लावण्याचे काम या काव्यसंग्रहाने केले. एकदा वाचाच .. आपसुक तोंडातून लव यू ढसाळ आल्याशिवाय राहत नाही.
नामदेव ढसाळ त्याच्या कवितासंग्रहाची बातमी सांगत आला तेंव्हा मला आनंद वाटला. कवितांचा मी व्यासंगी वाचक नाही. परंतु कविता समोर आली तर घाईने उलटतही नाही. ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काहीवेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या. तरीही त्यामागचे मन जाणवले होते. नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, ते तेंव्हा कळले. इतके प्रश्न मनात जमले की काही विचारणेच जमले नाही. ढसाळ थोडासा हसला, मी थोडासा हसलो. ढसाळचे हसणे मला जवळिकीचे वाटले नाही. असेही वाटले की ते जवळिकीचे का असावे? त्याच्या मनात माझ्या जगाविषयी एक आकसच असला पाहिजे. त्याच्या लेखी मी त्या जगाचा प्रतिनिधीच नव्हतो काय?
नंतर काहीवेळा तो दिसत असे, पण हा माणूस आपल्याशी नीट बोलणार नाही असे माझ्या मनाने घेतले होते. ढसाळची कविताच त्याच्यापेक्षा मला जवळची होती. तिच्यातले अनेक शब्द, प्रतिमा न कळूनही ती मला अस्सल, कसदार आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. या कवितेशीच माझी प्रसंगाप्रसंगाने एका मर्यादेपर्यंत दोस्ती जमलेली होती. आणि ढसाळ एकदा माझ्याशी आपण होऊन बोलला.मला खूप बरे वाटले.
या आश्चर्याला नंतर फार वाव उरलाच नाही. ढसाळ माझ्याकडे येऊ लागला, बसू लागला, हसू-बोलू लागला. इतके खोलवर वेदनेने आणि रागाने भरलेले काव्य लिहिणारा हा तरुण इतका प्रसन्न हसतो कसा, याचे मी नवल करी. असाच तो आला आणि हसत म्हणाला, ‘माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.’ त्याने फार प्रयत्न न करताच मी होकार दिला. आता आठवते की माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी आग्रहाने सांगितले पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते. तो म्हणाला, “तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही.”
कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार? केवळ एखादी गोष्ट आपल्याला समजते तशी आणि तेवढी आवडते हा काही तिच्यावरील आपला अधिकार ठरत नाही. जसजसा विचार करू लागलो तसतसा माझा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास आणखी कमी होऊ लागला. मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहित करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला ‘सर’ म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले. एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेषानरेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच. अज्ञानी मी होतो. चंद्रबिंदी म्हणजे काय, डोबरी म्हणजे काय, सादळलेली जडे म्हणजे काय, रांडकी पुनव कशी आणि कुठे असते, खैरबांडे पांजरपोळ डग्गा याचा अर्थ काय, धेडधाय पोटले कशाला म्हणावे, न…..नष्टचर्य असे एका कवितेत किंवा उजेड असे दुस-या एका कवितेत आवर्जून त्याने का लिहिले आहे, पाणचट गवशी कुठे असते, छप्पनटिकली बहुचकपणा नक्की कसा, मगरमच पलीत्यांचा अर्थ काय, कु. अनुराधा बुधाजी उपशाम कोण आणि कोठली, थम घेऊन म्हणजे काय करून, महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपड्या यात सांडणे शब्द कशाकरता, रायरंदी हाडूक कसे असते, खोडाबेडा हात म्हणजे कडे हात, बिंदाचिंदा हा कोठला शब्द, नेपाळी पोरी डावेउजवे कसे करतात, कंट्रीच्या मसाल्याची मलभोर मलय हे काय प्रकरण, पिंढ म्हणजे शरीराचा कोठला भाग, डिंगडांग धतींगचा शब्दार्थ काय, गुपची शिगा, डेडाळे, डल्ली,सल्ली, बोटी, गुडसे, डिलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात,- एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपने आणि अधिकाराने समजावले. समजावताना एकीकडे तो संकोचत होता(विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेह-यावर दिसत होता.
परंतु अर्थ विचारताना आणखीनच घोटाळा होऊ लागला. ढसाळच्या जगाविषयीच्या माझ्या घोर अज्ञानाने मला आता पुरते घेरले. कित्येक गोष्टींचे आपणाला ज्ञान नसते. नव्हे, अज्ञानच असते. परंतु जोवर त्या गोष्टीविषयी जाहीररीत्या व ते देखील लेखी काही म्हणण्याचा सवाल येत नाही तोवर अज्ञानासकट आपण सुखात असतो. ढसाळने मला हसत हसत खिंडीतच गाठले होते. माझ्या अज्ञानाची मला (क्वचितच वाटू शकणारी) शरम वाटली. इतक्या जवळ जगणा-या या जगाविषयी आपण असे मख्ख असावे हे जाणवले आणि बोचू लागले. मी ढसाळला म्हणालो, “मला तुझे जग पाहायचे आहे.” हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो. त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
परंतु इतकेच. एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार? फार फार वर वर मी थोडेबहुत पहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवीत होते. ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती. ढसाळची कविता आजही मला पुरती समजली आहे असे मला वाटत नाही. पण ती मला जरा जास्त समजू लागली आहे आणि त्याहूनही जास्त आवडू लागली आहे. ढसाळच्या जगात उभे राहून त्याच्या कवितेत डोकावण्याचा प्रयत्न टाकून, मी आता ढसाळच्या कवितेच्या पुलावरून त्याचे जग समजावून घेऊ लागलो आहे. ह्या जगाच्या प्रत्यक्ष आणि ढसाळनेच घडवलेल्या ओझरत्या दर्शनाने या कामी मला चांगली मदत झाली आहे.
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’- निर्मनुष्य प्रदेश -जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, गोलपिठा नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते.
हे जग आहे रात्रीच्या दिवसाचेरिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचेमरणाच्या खस्तांचेउद्याच्या चिंतांचेशरम आणि संवेदना जळून उरणा-या मनुष्यादेहाचेअसोशी वाहणा-या गटारांचेगटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणा-या तरुण रोगी देहांचे,बेकारांचेभिका-यांचेखिसेकापूंचेबैराग्यांचेदादांचे आणि भडव्यांचेदर्ग्यांचे आणि क्रुसांचेकुरकुरणा-या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचेगांजाच्या खाटल्याचेत्याच खाटल्यावरल्या कोप-यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला शरीफ‘ बनवण्याची महात्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणा-या क्षयरोगी बापाचेहिजड्यांचेहातभट्ट्यांचे,अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणा-या ऊन चिकट रक्तांचेवाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचेस्मगलिंगचेनागव्या चाकूंचेअफूचे.
१९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडी येणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणी त्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वाना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गि-हाइकाच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जीवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया-क्षमा-शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो, ‘इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच-उफराट्या काळजाचा-असतो.”
हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणा-या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते. नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज.-कदाचित तसाच जगाला असता;

परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीनदीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले
घटनेने दास्यमुक्त झालेपरंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळजुलूमपिळवणूक विटंबना संपली नाही. कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखा फुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते.
भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे, मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते. हागमूत, झवणं, लवडा, लेडाची गाडगी, जंतांच्या माळा यांचे नामदेव ढसाळ याच्या कवितेतले उल्लेख उपरे राहत नाहीत. त्याच्या सर्व कवितेमधून वाहणा-या खोलवरच्या संतप्ततेचे ते काव्यात्म उद्रेक बनतात आणि म्हणून कविताच वाटतात.
अनेक अपरिचित बोली-शब्द या कवितांतून सहजपणे येतात. परिचित शब्दांचे अनोखे उपयोग होताना दिसतात. या सा-यात विलक्षण आत्मविश्वास जाणवतो. पांढरपेशा थराने दिमाखात जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो, निर्दयपणे तिची मोडतोड करतो अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचे बुद्ध्याच एक विद्रूप करतो. त्याच्या कवितेतील आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. हे करताना भाषेचे पारंपारिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजले आहे याचेही पुरावे तो मधूनच देतो. या अशा गंगाजमनी, विद्रूप, मोडक्यातोडक्या परंतु अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ त्याचे जगणे एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेते. या जगण्यातला असह्य दाह कवितारुप होतो. या जगण्यातल्या अदम्य संतापाचा उकळता लाव्हा सुस्थित , संभावित जगावर चौफेर भिरकावीत नामदेव ढसाळ याची कविता जेंव्हा ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना’ हकारित, ‘अंधारयात्रिक’ होण्याचे नाकारीत, ‘शहराशहराला आग लावण्या’ चे पुकारे देत सुसाट निघते तेंव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणा-या ख-याखु-या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. या प्रकारचे जे कवी ढसाळ याने लिहिले आहे, ते चुकूनही प्रचारकी झालेले नाही हे विशेष. हि बंडखोरी आत्म्याची आहे; कंठाळी नाही. या बंडखोरीला -कवितेपुरते तरी-राजकीय रंग नाहीत, ती अधिक मूलभूत स्वरूपाची आणि म्हणून अस्सल आहे.
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे‘, ‘पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ठ‘ , असे म्हणण्याचा छातीठोक निर्भयपणा तिच्यात आहे.गोलपिठ्याच्या गल्लीबोळांतून मशाली पेटवून हिंडणा-या महाग्यानी‘ लोकांना उद्देशून, ‘ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार काळात नाही त्यांनी पेटलेल्या माणसांना छप्पन टिकली बहुचकपणा अजूनही दाखवावा?’ असे ती न कचरता म्हणू शकते. व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावेतसाहित्यसंघशाळाकॉलेजेहॉस्पिटलेविमानअड्डे यांवर हातबॉम्बहैड्रोजनबॉम्ब टाकावेत.‘, असे घोषित करण्याइतकी ती निर्णायक आहे. तडजोडीचे सर्व पूल तिने केंव्हाच उडवले आहेत आणि प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा तिने उचलला आहे. कवी ढसाळ याच्या कवितेला निकाली झुंजीचा जसा काही ध्यास लागून राहिला आहे. या ध्यासातली तिच्यात व्यक्त होणारी क्षणिक उदासीनतादेखील मरगळलेली नाहीतो बलदंड प्रज्ञेचा क्षणिक शीण भासतो. तो पराभव नव्हेती युद्धतहकुबी असते.
या कायम युद्धमान कवितेतला शृंगार, तिच्यातला वियोग, तिच्यातील तात्कालिक वैफल्य, तिच्यातील तसलेच वैराग्य किंवा तिच्यातले गा-हाणे, या सा-याला बंडखोर गरम रक्ताचा जो स्पर्श आहे तो मला तरी फार लोभसवाणा वाटतो. समाजातील दडपून आलेल्या थरातून आलेला ढसाळ हा काही पहिलाच कवी नव्हे. तो या थरातील पहिलाच गुणी कवी देखील नाही. परंतु मराठी कवितेच्या परंपरेचा काही वारसा घेऊनही तिच्यातले अर्वाचीन पांढरपेशे मन आपल्या कवितेत सरकू न देणारा, आपल्या कवितेचा पिंड अंतर्बाह्य आपल्या जगाशी पक्का बांधला ठेवलेला आणि या प्रयत्नात कोठेही खोटा, प्रचारकी वा कंठाळी न होणारा ढसाळ हा विरळा दलित कवी मात्र नक्कीच आहे. अद्याप तरी त्याला हे जमले आहे. त्याच्या कवितेने मला अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगाची आठवण मला दिली असे मी म्हटले तर त्यात मी ढसाळची औपचारिक स्तुती करतो असे कोणी मानू नये. तुकारामाचा अध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसह ढसाळची कविता वागवताना मला भासते.
कवी ढसाळचा भविष्यकाळ कसा असेल ते मला माहित नाही. त्याच्या सामाजिक थरातून मोठा दिलासा देत पुढे आलेले लेखक, कवी पाहता पाहता चुकीच्या अर्थाने पांढरपेशे, शब्दाळ किंवा रोमँटिक झालेले मी पहिले आहेत. त्यांच्या निर्मितीने आत्माच गमावला आणि ती निष्प्रभ बनली, जुन्या कीर्तीवर मिरवत राहिली. ढसाळ याचे असे न होवो.