Tuesday 18 September 2012

धम्मपदातील गाथा आणी अन्य महत्त्वाचे धम्मपद म्हणजे ज्ञानाचा महासागर.. धम्मपदातील काही महत्त्वाच्या गाथांचे मराठीत अर्थ व अन्य महत्त्वाच्या बाबी


धम्मपदातील गाथा आणी अन्य महत्त्वाचे
धम्मपद म्हणजे ज्ञानाचा महासागर.. धम्मपदातील काही महत्त्वाच्या गाथांचे मराठीत अर्थ व अन्य महत्त्वाच्या बाबी

••►जो बुद्ध, धम्म, संघाला सरण जातो, तो आपल्या प्रज्ञेने चार अरिय सत्य समजतो.

••►जगात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःख निरोध व दुःख मुक्तीचा अष्टांगिक मार्ग ग्रहन करणे कल्याणकारक आहे.

••►या सर्वांना सरण गेल्याने मनुष्य सर्व दुःखापासुन मुक्त होवु शकतो.

••
►डोक्याचे केस पांढरे झाल्याने कोणी पंडित होत नाही, थोर होत नाही. त्याचे आयुष्य वाढलेले असते. तो विनाकारण म्हातारा झाला असे आपण म्हणतो.
ज्याच्यामध्ये सत्य, धम्म, अहिंसा, सयंम, व दम आहे त्यालाच आपण पंडित म्हटले पाहिजे.

••►दुराचरण युक्त मनुष्य, दुसर्यांना भिक मागणारा मनुष्य भिक्खु होवु शकत नाही. जो पुण्यककर्म करतो, जो पापकृत्यापासुन दुर राहातो, जो ब्रम्हचरियेचे पालण करतो, ज्ञानपुर्वक विचाराने लोकांमध्ये वावरतो त्यालाच भिक्खु म्हणावे

••►ज्याचे शरीर शांत आहे, ज्याची वाणी शांत आहे. ज्याचे मन शांत आहे. जो समाधीयुक्त आहे. ज्याने सर्व तृष्णेवर मात केली त्यास भिक्खु म्हणतात.

••►भगवान बुद्धांचा जन्म सुखकारक आहे. भगवान बुद्धांचा धम्म उपदेश सुखकारक आहे. भगवान बुद्धाची संघएकता सुखकारक आहे. बुद्धाची समुह तपश्या सुखकारक आहे.

••►भिक्खुंचे स्थान महान आहे, त्यांचा मम्रतापुर्वक सन्मान केला पाहिजे, वंदामी भंते असे भिक्खुला म्हणावे. असे बौद्ध गृहस्थ, उपासक यांनी केले तर एक आदर्श बौद्ध संस्कृतीची वाढ होईल.

••►कटु शब्दामुळे ज्याला राग येत नाही, तो सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय.

••►बुद्धाने दुःखाच्या कारणांचा व दुःखाच्या मुक्तीचा शोध लावुन सर्व विकारावर विजय मिळविला. संबोधी प्राप्त केली व मानवाच्या कल्याणासाठी लोकांना शेवटपर्यंत धम्म शिकविला म्हणुन आपण बुद्धाला सरण गेले पाहिजे.

••►नैसर्गीक सत्य, नियमांशी श्रद्धा व एकनिष्ठता व्यक्त करण्यासाठी धम्माला सरण गेले पाहिजे.

••►तथागताच्या मार्गावर राहुन, निब्बाण प्राप्तीसाठी एक निष्ठेने प्रयत्न करनार्या लोकांचा तो एकमेव समुह आहे, म्हनुण आपण संघाला सरण गेले पाहिजे.

••►धम्म कार्यकरतान होणारा आनंद हा श्रेष्ठ आनंद आहे.

••►भारतीय राष्ट्रध्वजाच्या मधल्या पट्यावर धम्मचक्र रेखांकित केला आहे. 22-6-1947 ला मान्यता मिळाली. त्यावेळी पंडित नेहरुंनी म्हटले कि, धम्मचक्राचे भारताच्याच नव्हे तर संपुर्ण जगाच्या इतिहासातील सर्वात उज्वल असे नाव आहे, व तो जगाच्या स्वातंत्र्याचे प्रतिक ठरेल. महान बौद्ध सम्राट अशोकाची परंपरा पुढे चालविली पाहिजे असे मत घटना समिती सदस्यांनी व्यक्त केले.

••►राष्ट्रपतींचा जेव्हा पहिल्यांदा शपथ विधी होत होता, तेव्हा त्या प्रसंगी इतर देव देवतांच्या मुर्ती न ठेवता फक्त भगवान बुद्धाची मुर्ती ठेवण्यात आली होती.

••►धम्म हा सार्वत्रिक आहे. त्याला जाती, पंथ, धर्म याचे बंधन नाही. वेगवेगळ्या जाती व धर्माचे लोक स्वतःच्या व इतरांच्या भल्यासाठी अनुकरण करु शकतात.

••► सर्व उत्पन्न होणाऱ्या वस्तू अनित्य आहेत ,असे प्रज्ञेद्वारे ज्याला
समजते , तो दुक्खातून मुक्त होतो ; आणि हाच खरा मन शुद्धीचा खरा मार्ग आहे.

••► सर्व उत्पन्न होणारे दुक्खमय आहे, हे जेव्हा साधकाला समजते ,
तेव्हा त्याला दुःखाची घृणा येते, हाच चित्तशुद्धी मार्ग आहे.


No comments:

Post a Comment